कोकण

पर्यावरण, शेतकऱ्यांना शक्तीहिन करणारा ‘शक्तीपीठ’ नकोच

CD

69276


पर्यावरण, शेतकऱ्यांना शक्तिहीन
करणारा ‘शक्तिपीठ’ नकोच

भाई चव्हाण ः आझाद हिंद शेतकरी संघटनेची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ ः ‘भाविकांना राज्यातील मोठ्या मंदिरांकडे जाण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग केला जात असल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, आजच्या घडीला अशा मंदिराकडे जाण्यासाठी दोनहून अधिक पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यावरण, शेतकऱ्यांना शक्तिहीन करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे हा महामार्ग नकोच,’ अशी रोखठोक भूमिका आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी जाहीर केली आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, ‘राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या आझाद हिंद शेतकरी संघटनेची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दृक्‌श्राव्य सभा झाली. त्यावेळी चव्हाण यांनी ही भूमिका मांडली आहे. यावेळी संस्थापक-अध्यक्ष ॲड. सतीश रोटे-पाटील, चंद्रकांत झोरे, डॉ. अमित दुखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित गोव्यापर्यंत जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी आजच्या घडीला ८६ हजार कोटींचा खर्च होणार आहे. तो खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. त्यानंतर वर्षांनुवर्षे टोल वसुली केली जाईल. त्यामुळे तो कोणाच्या फायद्यासाठी बांधला जाणार आहे, हे स्पष्ट होत आहे. ग्लोबल वार्मिंग वाढून जागतिक पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. पर्यायी महामार्ग उपलब्ध असताना या महामार्गाचा अट्टाहास म्हणजे मानवी जीवनाचा, पर्यायाने निसर्गाचा मोठा ऱ्हास आहे. यंदाच्या वर्षी जागतिक स्तरावर अवकाळी पावसाने जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजविला आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे पर्यावरण, शेतकरीवर्ग आदींना शक्तिहीन करणारा ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा शक्तिपीठ महामार्ग होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांसह, सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमींनी एकजूटीने संघर्ष करून विरोध केला पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT