कोकण

काजू उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी

CD

काजू उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी

आंबा पिकास अधिक भरपाई; शेतकरी संघटना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः जिल्ह्यातील फळपिक विमा योजना २०२४-२५ (आंबिया बहार) संदर्भात एक नवा पेच निर्माण झाला आहे. खासगी कंपनीकडील हवामान घटकांच्या नोंदीनुसार, प्रति हेक्टरी संभाव्य विमा भरपाई निश्चित करण्यात आली असून यात तालुक्यात सर्वाधिक काजूचे उत्पादन होत आहे. मात्र, आंब्याला काजूच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक भरपाई जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या विरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवला असून, जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली.

फळपिक विमा योजना (आंबिया बहार) २०२४ साठी खासगी कंपनीने सादर केलेल्या हवामान घटकांच्या नोंदीवर आधारित भरपाईच्या आकडेवारीने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण केला आहे. प्राप्त माहितीनुसार, कृषी विभागाकडे पाठवलेल्या अहवालात सावंतवाडी तालुक्यासाठी आंब्याला प्रति हेक्टरी ६८ हजार तर काजूला केवळ १५ हजार ६०० रुपये अशी भरपाई निश्चित करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुका हा काजू उत्पादनात अग्रेसर आहे आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत काजू पिकाचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत, सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या पिकाला कमी भरपाई मिळणे, हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. माडखोल आणि आंबोली वगळता इतर मंडळांमध्ये काजूसाठी अत्यंत कमी भरपाई दर्शवण्यात आली आहे. विशेषतः सावंतवाडी, निरवडे, मडूरा, क्षेत्रफळ आणि बांदा या मंडळांमध्ये आंब्यासाठी अधिक भरपाई मिळत असताना, काजूला मात्र केवळ १५ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकीच रक्कम प्रस्तावित आहे. माडखोल आणि आंबोली येथे काजूसाठी ४२ हजार रुपये भरपाई असली तरी, ती आंब्याच्या तुलनेत कमीच आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर हवामानामुळे आंब्याचे नुकसान होते, तर त्याच हवामान घटकांचा परिणाम काजूवरही होतो. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी पिकांमधील भेदाभेद न करता नुकसानीच्या प्रमाणात योग्य भरपाई द्यावी. अनेक शेतकरी केवळ काजूवरच अवलंबून असल्याने त्यांना योग्य भरपाई न मिळाल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला विमा कंपनीचे प्रतिनिधी, संबंधित कंपनीचे अधिकारी आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात चर्चा होऊन योग्य तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा आहे.
-------------
जिल्हाधिकाऱ्यांकडून आशा
जिल्हाधिकारी या प्रकरणात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील, अशी आशा येथील शेतकरी व्यक्त करत आहेत. या बैठकीचा निकाल जिल्ह्यातील हजारो काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. योग्य आणि न्यायपूर्ण निर्णय झाल्यास, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे नुकसान भरून काढण्यास मदत होईल; अन्यथा फळपिक विमा योजनेच्या उद्दिष्टांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
---
कोट
आंब्याला काजूच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक भरपाई जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवला आहे. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा.
- वसंत उर्फ अण्णा केसरकर, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संरक्षण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT