कोकण

विद्यार्थी पालकांमध्ये सुसंवाद गरजेचा

CD

rat७p१२.jpg-
२५N७५९४७
साखरपा : तिल्लोरी कुणबी समाज साखरपा पंचक्रोशीच्या विद्यार्थी गुणगौरव व समाजप्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.
--------
विद्यार्थी, पालकांमध्ये सुसंवाद गरजेचा
डॉ. सदानंद आग्रे ः साखरपा तिल्लोरी कुणबी विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ८ : विद्यार्थी, पालकांमध्ये व कुटुंबामध्ये सुसंवाद महत्त्वाचा आहे. मुलांनी आई-वडिलांची स्वप्नं समजून घेतली पाहिजेत आणि संयम ठेवला पाहिजे. फक्त परीक्षेतील गुणांच्या मागे न लागता कठोर परिश्रम घेतले तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही; मात्र विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेतले तर यश दूर नाही, असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सदानंद आग्रे यांनी केले.
साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाज प्रबोधन सोहळा रविवार (ता. ६) लाड सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. १५० विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य आणि प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. संस्थाध्यक्ष सीताराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला उद्योजक विष्णूशेठ रामाणे, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, प्राचार्य विजय बाईंग, शंकरशेठ नवाळे, अमोल लाड, हरिभाऊ धुमक, कुणबी पतसंस्था लांजा, शाखा देवरूखचे शाखाधिकारी गंगाराम कालकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबईत 'गणपती बाप्पा' ला भव्य निरोप, १८,००० मूर्तींचे विसर्जन

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT