-rat१४p१२.jpg-
२५N७७४२५
रत्नागिरी ः जिल्हा परिषद अंशकालीन महिला परिचर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले.
------
अंशकालीन परिचरांचा संप सुरूच
पालकमंत्र्यांना निवेदन ; प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्षाने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचरांनी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात या महिलांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले.
गेली पाच वर्षे अंशकालीन महिला परिचर आंदोलन करत आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे १ जुलैपासून त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्यांचे कामबंद आंदोलन सुरूच असून, रविवारी त्यांनी पालकमंत्री सामंत यांना मागण्यांबाबत निवेदन दिले. या वेळी संघटनेच्या अध्यक्षा आकांक्षा कांबळे, स्वरा आगरे, पृथ्वी सावंत, समृद्धी भाटकर आदी उपस्थित होत्या.
अंशकालीन या नावात बदल करणे, प्राथमिक आरोग्यकेंद्रात महिला परिचरांमधून थेट घेण्यात यावे, वेतन २१ हजार देण्यात यावे आदी या अंशकालीन परिचरांच्या मागण्या आहेत. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्यकेंद्रात ३५० अंशकालीन महिला परिचर आहेत. सध्या या सर्व संपात सहभागी झाल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर थोडाफार परिणाम झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.