कोकण

-सदर-गणू गावकराचा असाही न्याय

CD

गावच्या मालका .........लोगो
(६ जुलै पान सहा)

गावात ग्रामदेवतेचा शिमगा हा मोठा सण. आदल्या दिवशी गोडे सण अन् दुसऱ्या दिवशी तिखटे सण. तिखट्या सणाच्या दिवशी कितीही गरिबी असुद्या त्या घरात वशाट असणारच. शिमगा काळात गावकराची वट मोठी. अशा गावकऱ्यापैकी एका न्यायी गावकराचा हा किस्सा.....
-rat१९p१३.jpg-
P25N78510
--आप्पा पाध्ये-गोळवलकर
---
गणू गावकराचा असाही न्याय
गावचे व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी एक कार्यकारी मंडळ असावे लागते, त्या मंडळाचा प्रमुख म्हणजे गावकर. आता या गावकराला मदत करण्यासाठी प्रत्येक वाडीवस्तीतील एखाद्या प्रतिष्ठित घरातील इसम नेमलेला असतो. असे साधारण १५/२० लोकांच्या हातात गावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वंशपरंपरेने चालत आलेली असते. यांना खुमदार म्हणतात अन् या खुमदारांचा जो प्रमुख असतो त्याला गावकर म्हणतात. केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय वा एखादे चुकीचे काम यांच्याकडून घडले तर त्या गावकरावरच ठपका येत असतो. अर्थात, त्याच्या तोंडावर बोलण्याचे धाडस कोण करत नाहीत. मग हे लोक गावकराच्या नेतृत्वात देवस्थानांचे सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर तंटेबखेडे सोडवणे (हे जर या लोकांनी केले नाही तर पोलिसांची संख्या पंचवीस पटीने वाढवावी लागेल.) अशी कामे करत असतात तर किस्सा आहे जुना. आमच्या गावाचे गावकर होते गणू धर्मा दुदम. त्या काळी आतासारखी दारू नव्हती. सणासुदीलाच तालेवार लोक दहाबारा मैलावरील दारूच्या पिठ्यावरून दारू आणत. गावात ग्रामदेवतेचा शिमगा हा मोठा सण. आदल्या दिवशी गोडे सण अन् दुसऱ्या दिवशी तिखटे सण. तिखट्या सणाच्या दिवशी कितीही गरिबी असुद्या त्या घरात वशाट असणारच. शिमगा झाला की, देव भोवणीला बाहेर पडतो तर झालं असं, पहिल्यांदा आमच्याकडे देवाची पालखी येते. पूजाअर्चा झाली की, रात्री खेळे होतात अन् दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वाडीत ती जाते; पण सकाळी दुसऱ्या वाडीत पालखी नेण्यासाठी गावकराची संमती जरूरीची आहे तर त्यावर्षी आमच्या गणू गावकरांना सकाळी यायला थोडा उशीर झाला. गावकरी वाट बघून थकले म्हणून एका खुमकऱ्याने म्हणजे गोपाळाने गावाला पालखी उचलायला सांगितली. तसे भोयानी पालखी, ढोल्याने ढोल, निशाणवाल्यांनी निशाण, डबी (छोटी तिजोरी) असे मानाप्रमाणे साहित्य घेऊन पालखी निघाली. जेमतेम अर्धा किमी पालखी गेली असेल नसेल तोवर गणू गावकर आले. त्यांनी आमच्या आबांना विचारले, खोतानो देव गेला! आबा म्हणाले, हो आत्ताच गेला. तसा गावकर घाईने पुढे गेले अन् पालखी गाठली.
पालखी थांबवली अन् विचारते झाले की, कोनच्या हुकमानं द्येव उचललाव? कोणीच काही बोलेना हो. गणू गावकराचा दराराच होता तसा. थोडी हिंमत करून गोपाळ बोलता झाला. नाय, गावकरानू तुमाना वाईच उशीर झाला मग म्होरल्या वाडीतल्या पूंजा आटपायच्या नाय म्हनू मीच बोल्लो देव उचलायला. त्याबरोबर एक चकार शब्दही न बोलता गणू गावकराने एक कानाखाली दिली ठेवून अन् गाववाल्यांना म्हणाले चला आता देव घेऊन.
शिमगा आटोपला अन् प्रथेप्रमाणे गावाची बैठक आमच्या घरी जमली. सारे मानकरी, खुमकरी, गावकरी जमलेले होते. तेव्हा गोपाळ आपली कैफियत मांडत म्हणाला, खोतानू गावकरांनी का मला मारलानी? माझे आजोबा तात्या अन् चुलत आजोबा आबा होतेच. त्यांनी गणू गावकरांना विचारले, गणू तू गोपाळाला खरोखर मारलेस? तसा गावकर म्हणाले, होय मी गोपाळाच्या दोन कानसुलात मारल्या पन कायद्यान मारल्या. मग आबांनी विचारले का मारल्यास? तेव्हा गावकर म्हणाले, आबा या देवभोवणीची जिम्मेदारी माझी, त्यात काय कमी-जास्त झाले तर तुम्ही मलाच विचारणार ना? मग भविष्यात कोणपण उठेल अन् कायपण करेल अन् काय अनुपत झाली तर त्याला जोखीमदार कोण? लगेच तात्या सरसावले अन् म्हणाले, गणू तुझं १०० टक्के बरोबर आहे. गोपाळाला तू कमीच शिक्षा दिलीस तेव्हा गोपाळाने आज पाच रुपये दंड भरावा. गणू गावकरांचा कितीही जवळचा माणूस असला तरी च्याय तिकडे न्याय, असे ते कधीच वागले नाहीत म्हणूनच आज इतक्या वर्षांनीही त्यांची आदराने आठवण काढली जाते. आज त्यांचा नातू त्यांच्यासारखेच न्यायीपणाने गावकरकी चालवित आहेत.

(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrababu Naidu wife New: चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीने ‘या’ FMCG शेअरमधून एकाच दिवसांत कमवला ७८,८०,११,६४६ रुपयांचा नफा!

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT