कोकण

राजीवड्यातील बांगलादेश ही नोंद काढून टाका

CD

राजीवड्यातील ‘बांगलादेश’ नोंद काढा
उदय सामंत ः मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : शहरातील बांगलादेश हे नाव रत्नागिरी पालिकेच्या नोंदणीतून काढून टाकण्यात यावे. तसेच या ठिकाणाला श्री देव विश्वेश्वर मंदिर मार्ग असे नामकरण करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या मंगळवारी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बांगलादेश नाव बदलण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधून बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून घेतला आहे. तसे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. हा मार्ग श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचे नामकरण करावे, अशा देखील मी सूचना केल्याचे सामंत यांनी सांगितले. शेवटी राजीवडा आणि श्री विश्वेश्वर मंदिर यांच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे त्याला बांगलादेश या नावाने संबोधले जायचे. हे आपल्या देशाच्या, महाराष्ट्राच्या, जिल्ह्याच्या आणि रत्नागिरीच्यादृष्टीने अयोग्य असल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात 3 लाख कुणबी नोंदी, जुन्नर- खेडमध्ये सर्वाधिक दाखले; मराठा आरक्षण जीआर आधीच आकडेवारी समोर

Asia Cup 2025 AFG vs HK : अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगचा दारुण पराभव...

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Panchang 10 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Education : राज्यात शिक्षणगळती चिंताजनक; इयत्ता नववी-दहावीतील ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणातून बाहेर

SCROLL FOR NEXT