ई-केवायसीसाठी गुरुवारपर्यंत मुदत
पुरवठा विभाग ; शिधापत्रिकाधारकांना संधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात रास्त दराच्या धान्य दुकानातील शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांनी ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी अन्यथा शिधापत्रिकेवरील धान्य बंद होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात ई-केवायसीचे काम सुरू आहे. त्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. अद्याप काही ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ८५ हजार ७९५ रेशनकार्ड धारक ई-केवायसीविना आहेत, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी जुलै अखेरपर्यंत सार्वजनिक वितरण प्रणाली, विविध रेशनदुकानात किंवा घरातून ऑनलाईन प्रणाली वापरून आपली ई-केवायसी पूर्ण करावी अन्यथा रेशनदुकानातून मिळणारे धान्य मिळणार नाही, असा इशारा पुरवठा विभागाच्यावतीने संबंधित शिधापत्रिकाधारकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ६६६ जणांच्या ई-केवायसीला मान्यता देण्यात आली आहे तसेच २० हजार ९४७ जणांची केवायसी रद्द केली गेली आहे तर ३ लाख ५० हजार ७९५ जणांच्या ई-केवायसी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप २ लाख ८५ हजार ७९५ शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.