कोकण

पीक विम्याचे २ कोटी ५९ लाख जमा

CD

85593

पीक विम्याचे २ कोटी ५९ लाख जमा

सतीश सावंत ः शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन स्थगित

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ : जिल्ह्यातील भात पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि फळबाग लागवडधारक शेतकऱ्यांनी विमा उतरवूनही त्यांची नुकसान भरपाई न मिळाल्याने महाविकास आघाडीतर्फे २० ऑगस्टला धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, भात पीक विमा नुकसानीचे २ कोटी ५९ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याने हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती जिल्हा कृषी अधीक्षकांनी केली आहे. त्या अनुषंगाने कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे यांनी आज नियोजित धरणे आंदोलन स्थगित करण्याबाबत पत्र दिल्याने उद्याचे आंदोलन रद्द केल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील विजय भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्री. सावंत म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी जिल्हा अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. भात पीक विमा योजना, काजू -आंबा फळपीक विमा योजना, निवडणुकीपूर्वी विम्याची रक्कम एक रुपये भरा, असे महायुती सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरणा केली होती. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऑगस्ट उजाडला तरी विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे उद्या (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने कृषी अधीक्षकांनी आज भेट घेत पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, २०२४ मधील भात पीक विम्याचे ८ हजार शेतकऱ्यांपैकी ६ हजार शेतकऱ्यांचे २ कोटी ५९ लाख उपलब्ध झाले आहेत. साधारण २ हजार २०० शेतकरी प्रलंबित आहेत, ज्यांचे नुकसान एक हजारपेक्षा कमी आहे. अशांची रक्कम थकीत आहे. ती लवकरच दिली जाईल. काजू-आंबा निकष घोषित केले नसल्याने पात्र शेतकरी निश्चित झाले नाहीत. ३० ऑगस्टपर्यंत निकष जाहीर होतील; तसे न झाल्यास संबंधित विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवू. केंद्र आणि राज्याने विमा हप्ता भरणा केला नाही. त्यामुळे विम्याची रक्कम प्रलंबित राहिली आहे.’’
दरम्यान, गणेशोत्सवात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत; अन्यथा धरणे आंदोलन छेडू, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. कृषी अधीक्षकांनी केलेल्या विनंतीचा आदर राखून उद्याचे आंदोलन मागे घेतले असले तरी पुढच्या काळात निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे करू, असा इशाराही सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
---
पाच हजारावर शेतकऱ्यांना मदत
दरम्यान, कृषी अधीक्षकांनी पत्रात म्हटले आहे की, खरीप हंगाम २०२४ मधील भात पिकाची काढणी पश्चात झालेली नुकसान भरपाई अदा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीकडून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ५ हजार ५९० अर्जदार शेतकऱ्यांना दोन कोटी ५९ लाख ५९ रुपये रक्कम पोर्टलवर वितरित केली आहे. उर्वरित २ हजार ४६१ अर्जदार शेतकऱ्यांना किमान रक्कम एक हजारप्रमाणे एकूण २२ लाख ४१ हजार रुपये रक्कम वितरित करायचे असल्याने शासन अनुदान प्राप्त होताच ती रक्कम वितरित केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT