कोकण

कामाच्या तासांमध्ये बदलाचा प्रस्ताव मागे घ्या

CD

कामाच्या तासांमध्ये
बदलाचा प्रस्ताव मागे घ्या
कामगार संघः मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनू
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ः राज्य मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत कारखाने कायदा अधिनियम १९४८ आणि दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियम यामध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुरुस्तीमुळे कामगारांच्या कामाच्या तासांत बदल होणार असून, सरकारच्या या निर्णयाला भारतीय मजदूर संघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असून कामगारांच्या कामांच्या तासात बदल करणारा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
सरकारच्या भूमिकेनुसार, बदलत्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन कारखाने व व्यापारी आस्थापनांमध्ये उत्पादनक्षमता वाढविणे, तसेच व्यवस्थापनाला लवचिकता देणे, हा या निर्णयामागील हेतू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामुळे कामगारांच्या हितावर गदा येणार असून, त्यांच्या आरोग्य व सामाजिक आयुष्यावर परिणाम होईल, असा आरोप मजदूर संघाने केला आहे. हा निर्णय कामगारांच्या हिताविरुद्ध असून, मालकपक्षाचा फायदा होईल. कामगारांवर अतिरिक्त तासांचा ताण येणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे निवेदन भारतीय मजदुर संघ सिंधुदुर्गच्या वतीने शासनाला देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय संघटन मंत्री भगवान साटम, जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव, प्राची परब, शुभांगी सावंत, दत्ताराम घाडीगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

Jalgaon News : भरपूर पाऊस झाला तरी संकट कायम! जळगाव जिल्ह्यात ५१२ गावांत पाणीटंचाईचे सावट; जिल्हा परिषदेचा कृती आराखडा तयार

Metro Station: बांधकाम झाल्यावर कळलं; मेट्रो स्टेनशनची उंची कमी! मग 'असं' केलं जुगाड

Raigad News : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत संकष्टी चतुर्थीला भक्तिमळा फुलला; दर्शनासाठी पहाटे पासून संध्याकाळपर्यंत रांगा!

Latest Marathi News Live Update : नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरील दिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT