92190
आंदोलनाऐवजी कायदेशीर लढा द्या
संजू परब ः जनतेला वेठीस धरणे चुकीचे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः येथील पालिकेच्या सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायलाच हवेत. मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. मात्र, शहरातील ४० हजार करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे देखील पालिकेचे कर्तव्य आहे. काम बंद आंदोलनाद्वारे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्याचे काही सहकारी जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत हे योग्य नाही. त्यांनी कायदेशीर मार्गाने आपला लढा लढावा, असे परखड मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.
शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत बंटी पुरोहित उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळायलाच हवेत, तो त्यांचा हक्क आहे आणि या मागणीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र, काम बंद आंदोलन करून शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणे आणि त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. मी नेहमीच कामगारांच्या पाठीशी राहिलो आहे. दोन-चार दिवसापूर्वी कामगारांचा पगार कोणी फोन केल्यामुळे काढण्यात आला, याची माहिती आधी संबंधितांनी घ्यावी. त्याचप्रमाणे कामगारांची ६५ लाख रुपयांची थकबाकी ठेकेदाराने द्यावी हे योग्यच आहे. पण, आरोप करणाऱ्यांचे दावे खरे आहेत का० याची खात्री केली पाहिजे. कामगारांचे पैसे त्यांना कायदेशीर मार्गाने मिळायला हवेत.’’
----------------
...तर मी स्वतः पुढाकार घेईन
येथील पालिकेने नेमलेले ठेकेदार हे जरी बाहेरचे असले तरीही प्रत्यक्ष सेवा पुरविणारे पोट-ठेकेदार मात्र स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांना देखील स्थानिक कामगारांची व्यथा माहिती असायला हवी. जर ठेकेदाराकडून कामगारांवर अन्याय होत असेल तर भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठीही मी स्वतः पुढाकार घेईन, असा विश्वास देखील श्री. परब यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.