कोकण

...तर जीवाची पर्वा न करता गेलो असतो ः केसरकर

CD

01634

...तर जीवाची पर्वा न करता
गेलो असतो ः केसरकर

रोहित आर्याप्रकरणी प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः मुंबईमध्ये पोलिस गोळीबारात ठार झालेल्या रोहित आर्या याने मुलांना ओलिस ठेवणे चुकीचे होते. त्याला ‘स्वच्छता मॉनिटर’ संकल्पना राबवण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र, मधल्या काळात त्याने काही मुलांकडून पैसे वसूल केले होते. ते परत करण्याची पूर्तता त्याने केली नव्हती. आता मी शिक्षणमंत्री नाही. त्यामुळे पुढे काय झाले? याची कल्पना नाही. माझी भूमिका सहकार्याची होती. मात्र, शिक्षण खात्याचे नियम त्याने पार पडणे गरजेचे होते. मी काल (ता. ३०) मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी गेलो असतो, असे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘रोहित आर्या याला मी धनादेशाद्वारे काही वैयक्तिक मदतही केली होती. त्यावेळी माझी भूमिका ही त्याला सहकार्याची होती. मात्र, शिक्षण विभागाने जे काही नियम घालून दिले होते, त्यानुसार त्याने वागणे गरजेचे होते. त्याला ‘स्वच्छता मॉनिटर’ ही संकल्पना राबवण्यासाठी दिलेल्या परवानगीनंतर त्याने मधल्या काळात मुलांकडून काही पैसे वसूल केले होते. ते पैसे त्या मुलांना परत करण्याबाबत त्याला सुचित केले होते. मात्र, त्याने तसे केले नव्हते. एकूणच काल घडलेल्या प्रकारानंतर मी जर त्याच्याशी फोनद्वारे चर्चा केली असती तर त्यातून चुकीचे काहीतरी घडले असते आणि मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. परंतु, त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी तशी चर्चा करणे गरजेचे होते आणि या आधीही मी शिक्षण खात्यांच्या लोकांबरोबर त्यांची चर्चा घडवून आणली होती. त्याने मुलांना ओलिस ठेवले हा प्रकार अत्यंत चुकीचा केला.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या भात शेतीसह फळबागायतदारांचेही नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने कोकणपट्ट्यात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांसाठी नुकसानीचा जीआर (शासन निर्णय) जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वांना भरपाई देण्यात येणार आहे. सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे.’’ बांदा येथील एका मुस्लिम तरुणाने केलेल्या आत्महत्यासंदर्भात त्यांना विचारले असता पोलिस प्रशासन योग्य तपास करत आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये लक्ष घालणार नाही. आवश्यक असल्यास त्यामध्ये लक्ष देईन. मात्र, पोलिस या प्रकरणाचा निश्चितच योग्य तपास करतील, असेही ते म्हणाले.
-------------
‘ओंकार’ला आठ दिवसांत पकडू
‘ओंकार’ हत्ती सद्यस्थितीत मतदारसंघातील कोनशी-भालावल या भागात आहे. तो माणसाळला, अशी लोकांची भावाना आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता त्याला आठ दिवसांत जेरबंद केले जाईल, असे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Mumbai Local Megablock: महिन्याच्या पहिल्याच रविवारी खोळंबा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकलवर परिणाम

Asian Youth Games 2025: चाळीतून उंच भरारी! पुण्याच्या चंद्रिकाने बहरीनमध्ये मुष्टियुद्धात सुवर्णपदकावर कोरले नाव

Purandar Airport : भूसंपादनासाठी हवे पाच हजार कोटी, प्रस्तावित पुरंदर विमानतळ; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या प्रसिद्ध कलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांच्या कुटुंबाशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT