कोकण

नोकरदार जावयाच्या अपेक्षेने उपवर मुलांची संख्या वाढतेय

CD

लग्नासाठी सरकारी शिक्का हवा!
जिल्ह्यातील स्थिती ; अपेक्षेने उपवर मुलांची संख्या वाढतेय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः दिवाळी गेली, आता हिवाळा सुरू झाला आहे. यंदा कर्तव्य आहे असे म्हणत सर्वजण तयारीला लागलेले आहेत. तीन वर्षांपूर्वी कोविडमुळे लग्नसोहळ्यांना ग्रहण लागले होते. प्रत्येक वडील आपल्या मुलींसाठी नोकरदार जावई शोधत असल्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यात उपवर मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
तीन वर्षांपूर्वी कोविडमुळे नोकऱ्या गेल्या. ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत तर काही मुलांनी शिक्षण घेऊन लहान-मोठे व्यवसायही सुरू केले आहेत; परंतु मुलगी पाहण्यासाठी गेल्यास मुलगा काय करतो? सरकारी नोकरी आहे काय? पगार किती आहे? जमीन किती आहे? मुलगा निर्व्यसनी आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मुलांची लग्न जुळवण्यात अनंत अडचणी निर्माण होत आहेत तसेच मुलांचे वयही वाढत आहे. हे चित्र ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. लग्न होत नसल्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रत्येक समाजात दिवसेंदिवस मुलींची संख्या घटत असल्यामुळे आणि मुलींच्या अपेक्षाही असल्यामुळे मुलींच्या लग्नात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नवरा नोकरदार, आई-वडिलांचा एकुलता एक, शहरात राहणारा या गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. अनेक तरुण सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी, व्यवसाय याकडे वळलेले आहेत. तरुणांचे वय वाढत असल्यामुळे घरून लग्नासाठी तगादा लावला जातो; पण सरकारी नोकरी नसल्यामुळे लग्न ठरण्यात अडचणी येत असल्याचे अनुभव अनेकाकडून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, मुलगी पाहण्यासाठी गेल्यास पसंती झाल्यास अनेक रूढी-परंपरा याला फाटा देऊन लग्नाचा संपूर्ण खर्च मुलाकडील मंडळी करण्यास तयार होतात; परंतु तरीही मुलींकडील लग्नासाठी तयार होत नसल्यामुळे ग्रामीण भागात उपवर नवरदेवांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे मुले मुलीकडून काहीच नको, मुलगी फक्त समजूतदार, कुटुंबाला सांभाळणारी, गरीब कुटुंबातील असली पाहिजे, अशा अपेक्षा ठेवत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात उपवर मुलांच्या लग्नाचा विषय मोठा बिकट होत असल्याचे चित्र आहे.
----
कोट १
प्रत्येक मुलींनी नोकरदारच नवरा असला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवू नये. समाजात उत्कृष्टपणे शेती करणारे, व्यवसाय, जोडधंदे, खासगी नोकरी करणारेही तरुण आहेत. त्यामुळे आपली मानसिकता बदलणे काळाची गरज आहे.
- रघुनाथ आमकर, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT