- rat१७p७.jpg-
२५O०४८७१
नाशिक ः रामशेज उपपिठावर वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळ्यात वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. सोबत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी.
---
पर्यावरण्याच्या समतोलासाठी वृक्षारोपण
गणेश नाईक ः जगद्गुरू नरेंद्राचार्यांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रयत्नातून झालेल्या वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. शेतकरी, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त, रस्तेसुरक्षा, वृक्षलागवड, रक्तदान, देहदान असे चौफेर कार्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी सुरू केले आहे, असे गौरवोद्गार वनमंत्री गणेश नाईक यांनी नाशिक येथे काढले.
रोपलागवडीच्या संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थानच्या सात उपपिठावरून काढलेल्या पायी दिंड्यांच्या माध्यमातून अवघ्या ३० दिवसांत १ लाख ११ हजार ४२४ रोपांची लागवड केली आहे. या वेळी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे उपस्थित होते. या वेळी वृक्षारोपणात सहकार्य केलेल्या २० व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी नाईक म्हणाले, यंदा पाऊस मेपासून नोव्हेबरपर्यंत रेंगाळला. यंदा मराठवाड्यातील काही गावांना तर पाण्याचा वेढा बसला. वृक्षतोड, औद्योगीकरण व भूगर्भातील निसर्गधन हावरेपणाने लुटल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. जगभरात वृक्षोरापण मोहीम हाती घेतली तर उष्णता झपाट्याने कमी होईल. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी राबवलेला वृक्षारोपणाचा उपक्रम म्हणून कौतुकास्पद आहे. त्यांच्या उपक्रमांची व्याप्ती वाढत राहो. वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नाही तर तो एक सामूहिक संकल्पयज्ञ आहे. आपण अध्यात्म व विज्ञानाची सांगड घातली तर निश्चितच यशाची शिखरे पादाक्रांत करू. वृक्ष म्हणजे जीवन आहे. ते पृथ्वीचा श्वास आहेत. आकाशाची छाया आहे. वाऱ्याची शीतलता आहे व मानवजातीचे भविष्य आहे. वृक्षा लावणे ही भक्ती आहे. पायीदिड्यांमधून आम्ही जनजागृती करत असतो. वृक्ष लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा असे आम्ही सांगत असतो. पुढचा आमचा संकल्प कच्चे बंधारे बांधण्याचा आहे. ७ ते १५ डिसेंबर या कालावधीत हजारो कच्चे बंधारे बांधले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---
चौकट
बिबट्यांचे हल्ले थांबवण्याचे प्रयत्न
राज्यभर बिबट्यांचे संकट वाढत असल्याचा उल्लेख करून नाईक म्हणाले, आज बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले वाढले आहेत. त्याच्या अधिवासात माणसाचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बिबटे मानवीवस्तीत येऊन हल्ले करत आहेत. यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. अनेक उपाय केले जात आहेत. उद्या संयुक्त बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा करणार आहोत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.