मतलई वाऱ्यांचा मासेमारी फटका
नौका बंदरात ; माशांच्या दरावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगवान वारे वाहू लागल्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीला वादळासदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मासेमारी करणे कठीण झालेले आहे. मच्छीमारी नौकांनी जवळच्या बंदराचा व खाड्यांचा आधार घेतलेला आहे. त्याचा फटका मासळीला बसला असून माशांचे दर वधारलेले आहेत.
गेल्या काही दिवसात वातावरणात सतत बदल होत आहेत. गेले दोन दिवस कोकण किनारपट्टीवर अचानक वेगवान वारे वाहू लागलेले आहेत. या वाऱ्याचा फटका मासेमारी नौकांना बसलेला आहे. समुद्र खवळलेला असून लाटांचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या शंभरहून अधिक नौका रत्नागिरीतील बंदरात दाखल झालेल्या आहेत. ४०० नौकांनी हर्णे तर जयगड खाडीत १५० नौका उभ्या आहेत. शंभरहून अधिक नौका आंजर्ले खाडी सुरक्षेसाठी दाखल झालेल्या आहेत. पुढील दोन दिवस असेच मच्छीमारांना शांत रहावे लागणार आहे. सकाळी व सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढत आहे नौका बंदरात उभ्या असल्यामुळे मासळी मिळणे दुरापास्त झालेले आहे. मतलई वाऱ्यामुळे खवय्यांसह बाजारातील मासळी विक्री करणाऱ्या महिलांनाही फटका बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.