-rat६p२५.jpg-
२५O०८९०९
लोणेरे (रायगड) ः लोणेरे येथे काढलेली तिरडी यात्रा.
---
महामार्गाच्या पूर्ततेसाठी जनआंदोलनाची ठिणगी
लोणेरेत तिरडी यात्रेने सुरुवात ; ११ जानेवारीपर्यंत ठिकठिकाणी आंदोलने
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने महामार्गाच्या पूर्णत्वासाठी जनआंदोलन उभारले आहे. त्याची सुरुवात शनिवारी (ता. ६) लोणेरे (जि. रायगड) येथून झाली असून, ठिकठिकाणी ११ जानेवारीपर्यंत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. शनिवारी लोणेरे येथे तिरडी यात्रा काढून महामार्गाच्या कामाचा निषेध करण्यात आला.
गेली सतरा वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. दरवर्षी हे काम पूर्ण होण्यासाठी नवीन तारीख आणि नवीन डेडलाईन जाहीर केली जाते; मात्र कामाची प्रगती न होता अजूनही महत्त्वाच्या परिसरातील कामे रेंगाळली आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीसह अपघातांची मालिका सुरूच आहे. आजवर सुमारे ४ हजार ५०० नागरिकांनी अपघातामध्ये जीव गमवावा लागला आहे तर हजारोंच्या संख्येने प्रवासी जखमी झाले आहेत. तरीही महामार्ग सुरक्षितपणे वाहतुकीस खुला झालेला नाही. आता जनआक्रोश समितीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ६ डिसेंबरला जनआक्रोश समितीच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर अंत्ययात्रा आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत आज तिरडी यात्रा काढण्यात आली. १३ ते १४ डिसेंबरला खेड ते चिपळूण, २७ व २८ डिसेंबरला लांजा ते हातखंबा, ३ व ४ जानेवारीला हातखंबा ते संगमेश्वर व १० आणि ११ जानेवारीला सावर्डे ते संगमेश्वर येथे आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येणार आहे. या वेळी समस्त कोकणवासियांच्या माध्यमातून समितीतर्फे शासनाकडे प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.
---------
चौकट
समितीच्या मागण्या
निवेदनामध्ये स्वतंत्र उच्चस्तरीय तटस्थ समिती नेमून महामार्गाचे पारदर्शक व प्रभावी तर तटस्थपणे परीक्षण करावे. यामध्ये जनआक्रोश समितीचे चार सदस्य सामावून घ्यावेत, अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दर आठवड्याला पाहणी करून प्रगतीचा अहवाल द्यावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियोजन करावे, तातडीने योग्य सूचनांचे फलक, बाधित अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळावी, महामार्गावर कायमस्वरूपी चोवीस तास ट्रामा केअर सेंटर उभारावे, स्थानिक जातीच्या वृक्षांचे रोपण करावे, महामार्गावर बाधित झालेल्या झाडांची भरपाई म्हणून तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण करावे, आदी मागण्या समितीने केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.