कोकण

बेरकी गावकऱ्यांचे तंटे अन् मुक्ती

CD

गावच्या मालका .........लोगो

ग्रामीण भागात आजही किरकोळ तंटेबखेडे गावातील प्रतिष्ठित लोकांच्या मार्गदर्शात मिटवले जातात. जर सर्वच तंटे/भानगडी पोलिस वा कोर्टात गेल्या असत्या तर आहेत त्याच्या पंचवीसपट पोलिस वा कोर्ट कमी पडली असती. गावगाडा चालवणारी ही मंडळी बहुतांशी निःस्वार्थी अन् निःस्पृहपणे हे काम पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.

rat१३p२.jpg- -
25O10397
- अप्पा पाध्ये-गोळवलकर, गोळवली
---
बेरकी गावकऱ्यांचे तंटे अन् मुक्ती

तंटामुक्त समित्यांपूर्वी गावातील तंटेबखेडे मिळवणारी एक समांतर न्याययंत्रणा होती. काही ठिकाणी ती आजही आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या न्यायमंडळात गावचे मानकरी, गावकर, वाडीचे खुमदार अशी मातब्बर मंडळी असतात. आमच्या गावातही ही पद्धत सुरू आहे; मात्र आता त्याचे प्रमाण काहीसे कमी झालेय हे नक्की.
एक किस्सा मला आठवतोय. झाली असतील या गोष्टीला ३०-४० वर्षे, आमच्या घरात ब्रिटिशकाळापासून पोलिसपाटीलकी आहे. त्या वेळी माझे काका पोलिस पाटील होते तर कोणाचे भांडण झाले की, एक पक्ष रात्रीबेरात्रीसुद्धा आमच्या घरी यायचा. शिवीगाळ झाली, पायला(मोठा कोयता) घेऊन अमकातमका मारेन म्हणतो, अशी कैफियत मांडायचा अन् निवाडा त्याच्या बाजूने व्हावा म्हणून हेही सांगायचा, फोजदारानू आमांनला शिव्या देलान त्या देलान पर मी बोल्लो की, आता जाता पोलिस फोजदाराकडे तवां ता म्हनाला, जा झो फोजदाराकडं. ता काय माझी xx वाकडी करतंय तां बगतां. (त्या काळी पोलिस पाटलास फौजदार म्हणत असत.)
आम्हा लहान मुलांना हे ऐकून राग येई. आम्ही काकाला म्हणायचो की, अशा शिवराळ इसमाला चांगला धडा शिकव तर काका गालातल्या गालात मिस्कील हसायचा. नंतर विरोधी पक्ष यायचा अन् तोही हीच बाब काकाला सांगायचा की, पुढे जेव्हा न्यायबैठक व्हायची तेव्हा हे सारे खोटे ठरायचे. आम्हालाही नंतर याची सवय झाली. एकदा एक गुण्या नावाचा इसम होता तो होता मोठा नग. किरकोळ बाबींवरून वाडीत तंटे करायचा, दारू खाऊन. दोन-चारवेळा तक्रार घेऊन वाडकरी आले तेव्हा काकाने त्यांना सांगितले की, गुण्या दारू पिऊन जेव्हा धिंगाणा करतो तेव्हाच तुम्ही त्याला घेऊन आमच्याकडे या. झाले आठ दिवस होतात न होतात तोच एके दिवशी तिन्हीसांजा गुण्या मॅरॅथॉनपटूसारखा धावत आमच्याकडे आला. तोही संपूर्ण भिजून कडाक्याच्या थंडीचे दिवस होते ते. आमच्याकडे पिरसा (शेकोटी) पेटवलेला होता गुण्या भिजून चिंब झालेला. धापा टाकतोय म्हणून काकाने आधी त्याला पिरशाजवळ बसायला जागा दिली अन् विचारले, गुण्या, काय झाले? तसा गुण्या म्हणतो, अवो भावकीने मला धरला नि ढोवात बुडवीत व्हते पर मी सटाकला ना धाव मारली ती हतपावत आता तुमीच काय तं बगा. या भावकीनं आज माजा जीव घेतलान असता. हे तो सांगतोय, तोच ४०-५० वाडकरी पाठोपाठ आलेच. गुण्याला शेकताना बघितल्यावर ओरडू लागले. च्वार गुलाम शेकतोस काय फोद्दाराकडे? आमानला रानोमाल धावडवून?
काकाने मग विचारले, अरे झाले काय? अन् गुण्याला तुम्ही डोहात का बुडवत होतात? तुम्ही कायदा का हातात घेत होतात?
तशी वाडीप्रमुख खुमदार म्हणाला, अवो फोजदारानू, गुण्या दोंपारपास्न सगल्यांना शिव्या देतोय. मागारणीला दांडकत व्हता तवां तुमच्या सांगन्यापरमाने आमी त्येला धरलीला नी तुमच्याकडे आनीत व्हतांव त तरीच्या शेताशी आलीला तवां गुन्या म्हनाला मला ईराक्तीला (लघवीला) व्हतंय म्हनू सोडलीला तर ह्यानं भेकऱ्यासारखी धाव मारलानना. तामनकोंडीत डुबकी मारून तुमचीकडं आलाय खोटारडा हायता. मग काकाने गुण्याच्या दोन थोबाडीत मारल्यावर गुण्याने खरे सांगितले. माते तिरडीवर जाईपर्यंत गुण्या काही सुधारला नाही असे नग होते गावात.

(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT