कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाकडे
प्रशासनाचे दुर्लक्ष : कदम
फौजदारी दाखल करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाबाबत तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. या दिरंगाईविरोधात तक्रारदार गणपत वासुदेव कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठवून ३० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सावंतवाडी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात ३ सप्टेंबरला एक वाद झाला होता. या वादाच्या संदर्भात श्री. कदम यांनी ४ सप्टेंबरला कनिष्ठ सहायक गौरांग परब यांच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही यावर कोणतीही हालचाल झाली नाही. प्रशासनाकडून होत असलेली ही टाळाटाळ महाराष्ट्र सेवा अधिनियमाचे उल्लंघन करणारी आहे, असे कदम यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ३० दिवसांच्या आत कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणाला पोलिस दरबारी नेले जाईल आणि झालेल्या विलंबाला प्रशासन सर्वस्व जबाबदार राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि पोलिस अधीक्षकांनाही माहितीसाठी पाठवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.