rat19p16.jpg-
18826
रत्नागिरी : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाला अंबर हॉलमध्ये विद्यार्थी, अभ्यासक, संशोधकांची गर्दी पाहायला मिळाली.
-----------
लोगो.... सागर महोत्सव
महासागर हवामान बदलाचा नैसर्गिक रक्षक
डॉ. शेखर मांडे ; हवामान साक्षरता व सार्वजनिक सहभागावर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : उष्णतेच्या लाटा, पूर आणि शहरी असुरक्षितता, हिमनद्या आणि जलसुरक्षा, किनारी भारत आणि चक्रीवादळेही हवामान बदलाची उदाहरणे आहेत. महासागर हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याचा एक प्रमुख स्रोत आहेत. आपण श्वास घेतो त्या ऑक्सिजनपैकी बहुतांश भाग महासागर देतात, तसेच आपण कार्बन डाय-ऑक्साइड सोडतो, त्यातला एक तृतीयांश भाग समुद्रात जातो. यासाठी हवामान साक्षरता बळकट करणे आणि विज्ञान, धोरणे व सार्वजनिक मूल्ये यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. तसेच हवामान बदल आणि सार्वजनिक सहभागाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर मांडे यांनी केले.
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित चौथ्या सागर सागर महोत्सवाची सांगता झाली. डॉ. मांडे म्हणाले, आपण श्वास घेतो त्या ऑक्सिजनपैकी बहुतांश महासागर देतात, तसेच आपण कार्बन डाय-ऑक्साइड सोडतो. त्यातला एक तृतीयांश भाग समुद्रात जातो. हवामान साक्षरता बळकट करणे आणि विज्ञान, धोरणे व सार्वजनिक मूल्ये यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. हजारो वर्षांपासून मानव समुद्रावर अवलंबून आहे. अन्नसाखळी, औषधे, खनिज संपत्ती, ऊर्जा, पर्यटन, व्यापार अशा विविध अंगांनी सागर मानवाच्या जीवनाशी जोडलेला आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून सागरी जैवविविधता, सागरी पर्यटन, पर्यावरण संरक्षण व सागरी अर्थव्यवस्थेचा प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सागरी जैवविविधतेचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, माहितीफलक, सागरी जीवांचे प्रत्यक्ष दर्शन याद्वारे उपस्थितांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात आली. अभ्यासक, संशोधक व समाजात वावरणाऱ्या अनेकांनी या महोत्सवात भाग घेतला. प्लास्टिक प्रदूषण, सागरी कचरा, अनियंत्रित मासेमारी यामुळे सागरी परिसंस्थेवर होणाऱ्या परिणामांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
पर्यावरण संवादक संतोष शिंत्रे म्हणाले, सृष्टीविषयक संवादाचे व्यापक सामाजिक कार्य म्हणजे एखादी गोष्ट अर्थवाही होण्यासाठी तिला निश्चित प्राप्त होण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे सृष्टी, निसर्ग, पर्यावरण यांच्याशी माणसाच्या संबंधांचा, नात्याचा उहापोह होणे ही सृष्टीच्या हिताची गोष्ट असते. सागर महोत्सवातून हीच गोष्ट घडत आहे.
कोट
पर्यटन लोकांसाठी असते, पण ते पर्यावरणपूरक असले पाहिजे. सागर पर्यटनाच्या विकासासाठी स्थानिक समाजाचा सहभाग आवश्यक आहे. सागरी परिसंस्थेचा समतोल राखत पर्यटनाचा विकास करणे ही काळाची गरज आहे. पर्यटन करताना पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आवश्यक आहे. आसमंतने सागराकडे कसे पाहावे हे या महोत्सवाच्या माध्यमातून शिकवले. तसेच धोरण निर्मितीसाठी आणि तज्ज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पर्यटनामुळे सागरातील जैवविविधतेला धोका पोहोचू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
- शमा पवार, माजी उपसंचालक, पर्यटन विभाग.
------------
कोट
सागर संवर्धनाबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या महोत्सवाचा उद्देश होता. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सागरी जीव, प्रवाळ, मासे, कासवे, खेकडे यांची माहिती प्रत्यक्ष पाहून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सागराविषयी कुतूहल आणि जाणीव निर्माण झाली.
- नंदकुमार पटवर्धन, संस्थापक संचालक, आसमंत.
----------
कोट
पर्यावरण बदल, हवामान बदल, वाढते प्रदूषण यामुळे सागर परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. सागर संवर्धनासाठी ठोस धोरणे, संशोधन, जनजागृती आणि शाश्वत विकास यांचा समन्वय आवश्यक आहे. शासन, शास्त्रज्ञ, स्थानिक समाज आणि नागरिक यांनी एकत्र येऊन सागर संरक्षणासाठी काम करणे गरजेचे आहे.
- डॉ. संजय देशमुख, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.