कोकण

देवरुख आगारातून मुंबई, पुण्याला जादा गाड्या

CD

देवरुख आगारातून
मुंबई, पुण्याला जादा गाड्या
होळीनिमित्त नियोजन ; परतीचा प्रवास होणार सुखकर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः शिमगा अर्थात होळीचा सण मार्चच्या पहिल्या आठवड्यात साजरा होणार आहे. यानिमित्ताने मुंबई, पुणे येथे उद्योग-नोकरी निमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासियांची कोकणात येण्यासाठी मोठी गर्दी होईल. याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळ देवरुख आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
येत्या २६ फेब्रुवारी पासून जादा गाड्या धावणार असून या व्यतिरिक्त आपल्या गावातून मुंबईला जाण्यासाठी जादा गाडी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातूनही आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी देवरुख आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. जादा गाड्या आणि त्यांची वेळ पुढीलप्रमाणे ः सकाळी ७ वा देवरुख-मुंबई, सायंकाळी ७.३० वा मुंबई-करजुवे, सकाळी ५.३० वा. देवरुख-बोरिवली, सायंकाळी ७.३० बोरिवली-ओझरे स्कुल, दुपारी १ वा. देवरुख-स्वारगेट, रात्री १०.३० वा स्वारगेट-देवरुख, सकाळी ७.३० वा. देवरुख-विठ्ठलवाडी, रात्री ८ वा. विठ्ठलवाडी-देवरुख, सकाळी ६ वा देवरुख-बोरिवली, रात्री ८.१५ वा. बोरिवली-तांबेडी संगमेश्वर. यापैकी देवरुख-विठ्ठलवाडी-देवरुख ही बस ११ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली असून उर्वरित सेवा २६ पासून उपलब्ध असतील. तसेच देवरुख-कल्याण, विठ्ठलवाडी-देवरुख ही बस प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास कायम सुरु ठेवण्याचाही प्रयत्न केला जाईल, अशी माहिती देवरुख आगार व्यवस्थापक श्रीमती मधाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

'नाना नसता तर लोकांनी मला मारलं असतं' जुनी आठवण सांगताना अशोक सराफ म्हणाले...'मी लोकांच्या तावडीत सापडलो असतो तर...'

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

SCROLL FOR NEXT