-rat२५p१५.jpg-
२६O२७१२०
राजापूर ः नदीपात्राची स्वच्छता करताना संत निरंकारी मंडळ-कोदवली राजापूरचे भक्तगण.
-----
आडविरेतील नदीनाल्यांसह परिसर चकाचक
संत निरंकारी मिशन ; प्लॅस्टिकसह अन्य कचऱ्याची विल्हेवाट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’अंतर्गत तालुक्यातील आडीवरे येथे शेकडो भक्तांन नदीनाल्यांसह परिसराची स्वच्छता करीत समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला.
संत निरंकारी मंडळ कोदवलीचे मुखी सिद्धेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवती मंदिर, महाकाली मंदिर परिसरासह त्या भागातील नदीनाल्याचीही स्वच्छता करण्यात आली. नदी-नाल्यातील पाणी प्रदूषित करणारे आणि पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकसह अन्य कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला. या वेळी संत निरंकारी मंडळाचे सेवादल युनिटचे संचालक दत्तराज सुवार, नारी सत्संग प्रमुख चारुलता चाळके, बालसत्संग प्रमुख सारीका कोतरे, प्रकाश हातणकर, विजय बंडबे, जयवंत मांडवकर, सुभाष नवाळे, दशरथ लिगम, रामचंद्र मांडवकर, प्रशांत घाणेकर यांच्यासह मोठ्यासंख्येने भक्तगण सहभागी झाले होते.
---------
कोट
स्वच्छ जल, स्वच्छ मन हा संदेश केवळ एक अभियान नसून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवतानाच मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संकल्प आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल.
--बाळकृष्ण मांडवकर, संदेश दास, संत निरंकारी मंडळ, कोदवली