कोकण

श्री महालक्ष्मी साळूबाईचा उद्यापासून शिमगोत्सव

CD

मिरजोळीत उद्यापासून शिमोत्सव
चिपळूण, ता. १ : मिरजोळी येथील ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मी-साळूबाईच्या शिमगोत्सवाला तीन मार्चपासून प्रारंभ होणार आहे. त्याची जय्यत तयारी मिरजोळी गावात केली असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सोमवारी (ता. २) रात्री १० वाजता श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर परिसरातील सहाणेवर पालखी सजवली जाणार असून ३ मार्चला पहाटे ५ वाजता मंदिराजवळ भद्रेचा होम झाल्यावर मंदिरापासून पवारवाडीपर्यंत मिरवणुकीने पालखीचे आगमन होणार आहे. त्यानंतर प्रथम तीन मानकरी घरातील आरत्या घेतल्यावर मिरवणुकीने पालखी दलवाई मोहल्ला मार्गे कोंढे सीमेवर जाताना त्या परिसरातील आरत्या घेणार आहे.
त्यानंतर चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या मानकरी घरातील आरती घेत दत्तवाडी येथे आगमन व येथील श्री दत्त मंदिर स्टेजवर बसून ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर पालखी घरोघरी जाणार आहे. ८ मार्चला उक्ताड येथून मिरवणुकीने पालखीचे मिरजोळी येथे आगमन होणार असून रात्री १२ नंतर मंदिर परिसरातील सहाणेवर लळिताने शिमगोत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT