रवींद्र भाट्ये यांचे निधन
रत्नागिरी, ता. १२ ः तालुक्यातील उमरे येथील सामाजिक, धार्मिक कार्यातील अग्रणी रवींद्र गोपीनाथ भाट्ये (वय ८५) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पाली येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान आणि नंतर मठमध्ये नव्याने उभारलेले श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान या संस्थांशी ते जवळून संबंधित होते. जुने अभंग, आरत्या, भोवत्यांची पदे त्यांना मुखोद्गत होती. मठ येथे झालेल्या लक्ष्मी पल्लीनाथाच्या चैत्रोत्सवातही ते सक्रिय सहभागी होते.