कोकण

स्वरोजगारात महिलांचे भविष्य उज्ज्वल

CD

39739

स्वरोजगारात महिलांचे भविष्य उज्ज्वल

सुषमा साखरे ः वागदेत महिला मेळाव्यास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने समृद्ध आहे, तसा तो विविधतेनेही समृद्ध आहे; पण दुर्दैवाने तो येथील मागासलेपणातही कमी नाही. या जिल्ह्यात समृद्धी निर्माण करायची असेल तर येथील तरुण आणि महिलांनी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे यांनी येथे केले.
सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्यावतीने शनिवारी (ता. २५) वागदे येथील गोपुरी सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम होते. निवृत्त उपजिल्हाधिकारी तथा तथागत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रोहिता तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. श्रीमती साखरे म्हणाल्या, ‘‘समाजाची प्रगती ही महिलांवरच अवलंबून आहे. महिलांनीच पुढे येऊन स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कामगार न बनता मालक बना.’’

सभापती तांबे यांनी, संविधान आणि बाबासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील रुढी परंपरा या सोडून परिवर्तनाच्या प्रवाहात या, असे आवाहन केले. डॉ. सराटे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. श्री. वळंजू यांनी, जिल्ह्यात पहिली पतपेढी या संस्थेने निर्माण केली; मात्र समाजाकडून आवश्यक तेवढे सहकार्य मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. प्रा. सुषमा हरकुळकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री. कदम यांनी पंचशील आचरणात आणा म्हणजे तुम्ही खरे बौद्ध बनाल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. ममता जाधव यांनी भीम गीत सादर केले. दुपारच्या सत्रात महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्रास्ताविक श्रद्धा कदम यांनी, स्वागत मिलिंद सरपे यांनी केले. सूत्रसंचालन ममता जाधव यांनी केले. स्वाती कदम यांनी आभार मानले.
.....................
पर्यावरणपूरक व्यवसाय करा
उद्योजक मुकुल कुलकर्णी यांनी पर्यावरणाचा ऱ्हास ज्या प्लास्टिकमुळे होतो, ते नष्ट करून पर्यावरणपूरक उद्योग निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक उद्योगात सिंधुदुर्ग हा जगाचा हब बनेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. बचतगटांनी पुढे येऊन या व्यवसायात पुढे यावे. यासाठी आवश्यक सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT