भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे नुकसान
राजापूर, ता. १५ः वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसात रत्नागिरी-भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये नारळाच्या विविध वाण संग्रहातील माड मोडून पडले असून मसाला पिके, सुपारी, केळी, कोकम या लागवडीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रोपवाटिकेमधील कलमे रोपांवरील शेडनेट उडून गेले असून कार्यालयाजवळील वीज खांब पडल्याने कार्यालय, प्रयोगशाळा येथील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.
- rat१५p१०.jpg-
26O43563
शुभ्रा सुतार
शुभ्रा सुतार राजापूर तालुक्यात प्रथम
राजापूर ः तालुक्यातील ओणी येथील शांताराम भट इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी शुभ्रा परशुराम सुतार हिने दहावीच्या परिक्षेमध्ये ९८.४० टक्के गुण मिळवीत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. पाचल येथील डॉ. श्रावणी सुतार व डॉ. परशुराम सुतार यांची कन्या शुभ्रा ही लहानपणापासून अत्यंत हुशार असून ती सोशल मीडियापासून आजही दूर राहिलेली आहे.