साडवली (रत्नागिरी) : सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण असो या काळात पुर्वापार श्रद्घा आणि अंधश्रद्घेची चर्चा रंगत असते.हे खावु नय,ते खावु नये तसेच घराबाहेर पडु नये,काही ठिकाणी देव पाण्यात बुडवुन ठेवण्याचीही प्रथा आहे.ग्रहणकाळात जेवण केलेले असले तर त्यावर तुळशीचे पान टाकण्याची प्रथा आहे.अशीच एक प्रथा म्हणजे ग्रहणकाळात परातीत मुसळ उभे रहाते.
सूर्यग्रहण काळात परातील मुसळ ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे लांजा शहरातील अनेक घरांसमोर आणी काही मंदिरांसमोर परातीत मुसळ उभे करण्यात आले असून ग्रहण काळात अधिक वजनाचे मुसळ परातीत सरळ उभे राहिले आहे .ग्रहणकाळ संपला की ते खाली पडते.पराग शेट्ये यांच्या घरासमोरील अंगणात हे मुसळ उभे राहीलेले होते.माञ याची दुसरी बाजु म्हणजे हे असे मुसळ कधीही उभे रहात असते असे अनेकांचे मत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.