accident
accident sakal
कोकण

मुंबई गोवा हायवेवर दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर दुचाकी स्लिप होऊन दगडाला धडक बसल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळीच्या सुमारास मळगाव सोनुर्ली तिठा येथे घडला तात्काळ स्थानिकांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर दुखापत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अधिक उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात आले आहे

साईश शिवदास सावंत (१८) व शुभम शिवदास सावंत (२१) अशी त्या दोघांची नावे असून ते दोघे भाऊ असल्याचे समजते आज सकाळी काम आटपल्यानंतर हे दोघे भाऊ गोवा येथून कुडाळ नारुरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. यावेळी येथील मळगाव सोनुर्ली तिठा येथे आले असता रस्त्यावर साचलेल्या खडीवर त्यांची दुचाकी स्लिप झाली. यामुळे गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरील बाजूच्या दगडाला धडकून सर्व्हिस रोडवर जाऊन पडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

नागरिकांना अपघात झाल्याचे समजताच धाव घेत रक्तबंबाळ स्थितीत दोघांना उपचारासाठी रिक्षातून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. एकाच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होत आहे तर दुसऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT