Uday Samant Sakal
कोकण

नितेश राणेंच्या टिकेमुळे शिवसेनेची मते वाढतात ; उदय सामंत

राणेंच्या टिकेमुळे शिवसेना वाढतेय: उदय सामंत; राजकीय उंची वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : आमदार नितेश राणे आमच्या बद्दल वाईट बोलले की आमची अर्थात शिवसेनेची मते वाढतात. त्यांनी आमच्याबद्दल वाईट बोलतच राहिले पाहिजे. यात भाजपचे नुकसान आणि शिवसेनेचा फायदा आहे. स्वतःची नसलेली राजकीय उंची वाढवण्याचाच राणेंचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टिका पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार राणेंवर केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.

नितेश राणे नेहमी आपल्यापेक्षा जास्त राजकीय वजनदार व्यक्तीवर टीका करतात. त्यामुळे माझ्यावर टीका करून मला त्या पंक्तीत बसवले ; उदय सामंत

ते म्हणाले, राणेंनी भाजपात नसताना आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे पुढे काँग्रेसला रामराम केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही वैयक्तिक टीका केली होती. नितेश राणे नेहमी आपल्यापेक्षा जास्त राजकीय वजनदार व्यक्तीवर टीका करतात. त्यामुळे राणेंनी माझ्यावर टीका करून मला त्या पंक्तीत बसवले त्याबद्दल त्यांचे आभार. राहिला प्रश्न त्यांनी किरण सामंत यांच्यावर टीका केलेल्या पत्रकार परिषदेचा. त्याला आमचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी फार छान उत्तर दिले आहे. मला परत त्यावर उत्तर देऊन राणेंना मोठं करायचं नाही. कुणीही कितीही टीका करू दे सिंधुदुर्गच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांनी माझ्याबद्दल किंवा मोठ्या भावाबद्दल जी टीका केली आहे ती किती खरी आणि किती खोटी आहे हे सिंधुदुर्गवासियांना माहीत आहे आणि त्याचा सविस्तर खुलासा पारकर यांनी केला आहे. तरीही त्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत.`

पूढे ते म्हणाले, आपण वर्षभरात काय काय विकासाची कामे केली हे जिल्हावासीयांना माहित आहे. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला पायलेट प्रोजेक्ट म्हणून विकसित केला जाणार आहे. चिपी विमानतळाचा प्रकल्प होऊ घातला आहे. ते चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. यासाठी सुरुवात कोणी केली, पाठपुरावा कोणी केला आहे हे लोकांना माहीत करून द्यावे लागत नाही, त्यांना माहित आहे. मेडीकल कॉलेजबाबतही समज-गैरसमज झाले; मात्र आघाडी शासनाने ९९६ कोटीची तरतूद मेडीकल कॉलेजसाठी केली आहे. पूरस्थितीमुळे मेडिकल कॉलेजचे डीन येऊ शकत नाही हे कारण नाही. दिल्लीकडे दिलेले प्रस्ताव उशिराने का मंजूर होतात ही विचार करण्याची वेळ आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यात काय उपयोग ?`

काहीजण स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करीत आहेत. ते प्रशासनाची माहिती न घेता खोटी माहिती सांगत आहेत. महामार्गावर पाणी साचते. त्याबाबतचे पत्र मीच सर्वात प्रथम दिले. आरोप-प्रत्यारोप करून एकतर्फी मतदान होणार नाही हा विरंगुळा आहे. काही लोक सध्या विनोदी झाले आहेत. राजकारणासाठी राजकारण नको विकास कोण करत आहे हे जनतेला कळत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT