urea is useful to rice and grass increases invention of girl in ratnagiri 
कोकण

शेतकऱ्यांनो चाऱ्याची पौष्टिकता वाढवायची आहे ? मग वाचा ही बातमी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : भाताच्या पेंढ्यावर किंवा सुक्‍या गवतावर युरियाची रासायनिक प्रक्रिया केल्यास चाऱ्याची पौष्टिकता वाढवता येते, असे अस्मिता वारेकर हिने प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. कोरोना टाळेबंदीमुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. कृषी पदव्युत्तर शिक्षणाच्या चौथ्या वर्षी ‘स्टुडंट रेडी’ (ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना) हा कार्यक्रम घेतला जातो. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी राबविण्यास सांगितले. या अंतर्गत अस्मिता वारेकर हिने कोतवडे या आपल्या गावी विविध उपक्रम राबवले. याचाच एक भाग म्हणून तिने गावातील शेतकऱ्यांना भात पेंढा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले. भाताच्या पेंढ्यावर किंवा सुक्‍या गवतावर युरियाची रासायनिक प्रक्रिया केल्यास चाऱ्याची पौष्टिकता वाढवता येते. 

पेंढ्यामधील प्रथिनांचे प्रमाण अडीच टक्‍क्‍यांवरून ८ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढते. त्यामुळे प्रक्रियायुक्त पेंढा जनावरांना दिल्यास अधिक उपयुक्त ठरतो, असे तिने प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. या वेळी सागर सनगरे, राजेश धावडे, योगेश पवार, राजेश पवार, श्रद्धा सनगरे, सुलोचना कुवार, अविनाश धुंदुर, दिलीप वारेकर आदी शेतकरी उपस्थित होते. तसेच शेतात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, त्यामुळे होणारे फायदे याची माहिती अस्मिता शेतकऱ्यांना देत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT