कोकण

निवडणुकीमुळे एसटी बसच्या अनेक फेऱ्या रद्द; प्रवाशांचा खोळंबा

अमित गवळे

पाली (जिल्हा रायगड) : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (ता. 23) रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेस कामगिरीवर होत्या. परिणामी नियमित वाहतुकीसाठी बसची संख्या अपुरी पडल्याने अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

रायगड लोकसभा मतदारसंघात 2179 मतदान केंद्रावर 15 हजार कर्मचार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी सोमवारी (ता.22) सकाळीच एसटी बसने मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले. निवडणूक संपल्यानंतर मंगळवारी (ता.23) रात्री उशिरा या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघात एसटी बसनेच सोडले जाणार आहे. त्यामुळे एसटी बसेस दोन दिवस गुंतल्या गेल्यात.

परिणामी, नियमित वाहतुकीवर ताण पडला. अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द झाल्या. याचा फटका प्रवासी व मतदानासाठी आलेल्या मतदारांना बसला. त्यांना वेळीच इच्छित ठिकाणी पोहचता आले नाही. वेळ वाया गेला तसेच गैरसोय देखील झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT