कोकण

पदवीधर तरूण करतायेत भाजीपाला शेती

सुनील पाटकर

महाड- नोकरी व्यवसायासाठी एकीकडे गावातील तरुण गाव सोडून स्थलांतरीत होत असतानाच महाड तालुक्यातील दुर्गम आदिस्ते गावातील तीन तरूणांनी एकत्रीत येत आधुनीक शेतीच्या माध्यमातून गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले आहे. हे तिनही तरूण पदवीधर असून दररोज लागणारा भाजीपाला शेतात पिकवून ते याच परीसरात त्याची विक्री करतात. त्यांचा हा प्रयत्न आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

कोकणातला तरुण शिक्षण झाले कि मुंबईत जातो, आणि गावातील शेती ओस पडते अशी स्थिती अनेक गावात आहे. परंतु, याला बगल देत आदीस्ते गावातील सुनिल साळवी, अंकुश मौले, सुरज दवंडे हे तिन सुशिक्षीत तरूण मात्र शेतीकडे वळले आहेत. गेली दोन वर्षापासून ते आपल्या दीड एकर परीसरात केवळ पालेभाजी आणि फळभाजी पिक घेत आहेत. यातील सुरज दवंडे याच्या वडीलांनी या शेतीला सुरवात केली होती. उन्हाळयात धरणाच्या पाण्यावर शेती करण्यास सुरवात केली. त्यांचा वारसा पुढे नेत या ततरूणांनी आपले शिक्षण पूर्ण करत शेती करण्यास सुरवात केली.

सुरज याने शेती विषयातील तिन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामुळे पारंपारीक भात शेतीबरोबर फळभाजी आणि पालेभाजी घेणे फायदेशीर असल्याचे लक्षात येताच या तीन तरूणांनी एक होत हा प्रयोग यशस्वी केला. भेंडी, गवार, चवळी, टाँमेटो, वांगी अशी विविध पिके वेगवेगळया हंगामात घेतली जात आहेत. या पावसाळयात त्यांना भेंडीचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळाले. येणा-या पिकाला या परीसरातच मार्केट उपलब्ध होत असल्याने शहरात पाठवण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. गावातच दुकानांतून किंवा घरातून भेंडी, गवार ही भाजी सहज विक्री केली जात असते.

गावाशेजारीच खैरे धरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प केवळ सिंचनाकरीता तयार करण्यात आला होता. आता यातील पाणी शेतकरी आता केवळ पिण्याकरीता वापरतात. परंतु हे तरूण उन्हाळयात याच धरणातील पाण्याचा वापर करून शेती करत आहेत. विविध कारणे पुढे करत शेती करणे टाळणाऱ्या तरूण व शेतकऱ्यांपुढे या तरुणांनी उदाहरण ठेवले आहे.

आमच्या गावाच्या शेजारीच धरण आहे. या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी होत असतो मात्र शिक्षीत तरूणांनी अशा प्रकारे धरणाच्या पाण्यावर शेती अथवा अन्य शेतीपूरक व्यवसाय उभा केल्यास शहरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. सद्या आम्ही केवळ भाजी पिकवतो आणि याच परीसरात विक्री करतो. शेती हे उत्पन्नाचे साधन नक्कीच आहे- सुनिल साळवी (तरूण शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT