देवगड ( सिंधुदुर्ग) - केंद्राने युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यासाठी रिफायनरी प्रकल्प आणला. राजापूर परिसरात प्रकल्प होऊन त्यासाठी आवश्यक असणारे बंदर तालुक्यातील विजयदुर्ग येथेच विकसित झाले पाहिजे, असे मत भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडे येथे व्यक्त केले. लोकसभा मतदार संघातील महत्वाकांक्षी प्रकल्प रायगड किंवा अन्यत्र हलविण्याचा दृष्टपणा शिवसेनेने करु नये, असेही त्यांनी सांगितले.
जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात श्री. जठार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते.
श्री. जठार म्हणाले, "" रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रकल्प भाजपच्या केंद्रातील सरकारने दिला. येथील युवकांना रोजगारांची संधी जास्तीत जास्त मिळावी. येथील विकास झपाट्याने व्हावा यासाठी प्रकल्प आहे. हा प्रकल्प राजापूर येथे होऊन त्यासाठीचे आवश्यक बंदर विजयदुर्गला विकसित व्हायला हवे, असा हट्टाहास आहे. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करणारा प्रकल्प असून येथील जनतेची मालमत्ता आहे. त्यामुळे रायगड किंवा अन्य भागात हा प्रकल्प नेण्याची हिम्मत शिवसेना नेत्यांनी करु नये. एकीकडे प्रकल्पामुळे तरूणांना रोजगार मिळेल तर दुसरीकडे बंदराचा विकास होवून शेतकरी आर्थिक सक्षम बनेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही प्रकल्पाच्या माध्यमातून होईल रत्नागिरी ते वेंगुर्लेपर्यंत पाण्याची टंचाई भासणार नाही अशी ताकद प्रकल्पात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांची प्रकल्प इत्तर ठिकाणी नेण्याचा मनात विचारही करु नये. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प दोन जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी व्हावा; पण तो याच लोकसभा मतदार संघातच झाला पाहिजे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.