Village Population Number Mistake In Tanda Vasti Planning Ratnagiri Marathi News 
कोकण

रत्नागिरी जिल्हा परिषद आढावा बैठकीत 'ही' चुक आली समोर

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट गावांची लोकसंख्या चुकीची मांडल्याचा धक्‍कादायक प्रकार जिल्हा परिषद समाजकल्याणकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पुढे आला आहे. त्यामुळे अधिकच्या निधीला जिल्हा मुकणार आहे. संतोष थेराडे यांनी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाला याची जाण करून देतानाच सुधारित आराखडा करण्याची गरज असल्याचे दाखवून दिले. 

समाजकल्याण समिती सभापती ऋतुजा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तांडा वस्ती सुधार योजनेच्या 2018 - 19 ते 2022 - 23 पंचवार्षिक बृहतआराखड्याला मान्यता देण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. संतोष थेराडे, दीपक नागले, पूजा नामे, मुग्धा जागुष्टे, दीप्ती महाडिक, सुनील तोडणकर, श्री. पुजारी आणि राज्य समाजकल्याणचे अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील तांडा वस्तींमध्ये रस्ते, पाणी योजना, विद्युतीकरण, शौचालये, समाजमंदिर, वाचनालय आणि मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे घेता येतात. त्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून मागविण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्याचा 32 कोटी 27 लाखाचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात 695 गावात तांडा वस्ती असून 79 हजार 938 लोकसंख्या आहे. 

संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखणी, धामणी या गावांची लोकसंख्याच चुकीची दर्शविली आहे. ही बाबत थेराडे यांनी बैठकीत पुढे आणली. याचे आराखडे लोकसंख्येनुसार ठरवले जातात. त्यामुळे जिल्ह्याला मिळणारा निधी कमी येणार आहे. ही लोकसंख्या ग्रामसेवकांकडून पंचायत समितीला येते. तांडा वस्तीचा आराखडा तयार केल्यानंतर राज्य समाजकल्याणकडून तो सदस्यांना माहितीसाठी दिला नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

समाजकल्याण अधिकारी एस. एस. चिकणे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर सुधारित आराखडा बनवण्याचे ठरले. ज्या अधिकाऱ्यांनी या चुका केल्या आहेत, त्याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे लवकरच घेणार आहेत. चुकीच्या आकडेवारीचा फटका जिल्ह्याला बसणार असून तांडा वस्तीसाठी मिळणाऱ्या निधीत फरक पडणार असल्याची खंत थेराडे यांनी व्यक्‍त केली. 

तांडा वस्तीसाठीचा आराखडा बनवताना वेळीच खबरदारी घेणे आवश्‍यक होते. तो शासनाकडे पाठविण्यासाठी आठ दिवस शिल्लक आहेत. कमी वेळेत कसरत करावी लागणार आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे हा गोंधळ उडाला आहे. 
- संतोष थेराडे, सदस्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Athletics: ५८.४५ मीटर लांब थ्रो आणि नवा इतिहास! समीर देशमुखने ७ वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडीत काढला!

इतकं जीव ओतून काम केलं पण... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं खरं कारण; म्हणाली, 'खूप वाईट...'

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या क्रीडांगणांवर आता CCTV, चेंजिंग रूम आणि टॉयलेट अनिवार्य! महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Kharghar Disabled girl : संतापजनक! नवी मुंबईत 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; पीडिता चार महिन्यांची राहिली गर्भवती

SCROLL FOR NEXT