आ.प्रसाद लाड यांचे पुष्पगूच्छ देवून स्वागत करताना माजी आ.पाशा पटेल सोबत व्यासपिठावर अन्य मान्यवर
आ.प्रसाद लाड यांचे पुष्पगूच्छ देवून स्वागत करताना माजी आ.पाशा पटेल सोबत व्यासपिठावर अन्य मान्यवर sakal
कोकण

जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर बांबू शेती शिवाय पर्याय नाही - पाशा पटेल

सकाळ वृत्तसेवा

खेड : जागतिक तापमान वाढ ही दिवसेंदिवस धोकादायक पातळी ओलांडत आहे. ही तापमान वाढ रोखायची असेल तर बांबू शेती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि बांबू लागवड आणि प्रक्रीया मुल्यवर्धनाची चळवळ राबविणारे पाशा पटेल यांनी खेड येथे केले. अ‍ॅग्रोवन, एसआयएलसी आणि जिओ, लाईफ अ‍ॅग्रोटेक इंडिया प्रा.लि.च्या वतीने येथील द.ग.तटकरे सभागृहात आयोजित १७ व्या बांबू संधी, मुल्यवर्धन आणि विपणन या कार्यशाळेत श्री.पटेल बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रसाद लाड यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोकण बांबू केन डेव्हलपमेंट सेंटर चे संचालक संजीव करपे, बांबू कापड उद्योजक आशिष कासवा, जिओलाईफ अ‍ॅग्रीटेक इंडिया प्रा.ली.चे विक्री अधिकारी किरण थोरात, खेड भूमिपूत्र फार्मस प्रोड्युसर कंपनीचे नामदेव निकम यांच्यासह शेकडो शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.

यावेळी श्री.पटेल म्हणाले की, कोकणातील शेतकर्‍यांनी पारंपारिक भातपिक किंवा आंबा, काजू, नारळ या सारख्या फळबागांच्या उत्पादनावर अवलंबून न राहता वेगळी वाट चोखाळायला हवी. जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या दगडी कोळशासारख्या इंधनाला बांबू एक उत्तम दर्जेदार पर्याय ठरला आहे. बांबू पासून टूथब्रश पासून कपड्यांपर्यंत अशा सुमारे १८०० जीवन उपयोगी वस्तुंची निर्मीती करता येते. भारतात पूर्वोत्तर राज्यामध्ये बांबू पासून वेगवेगळी उत्पादने निर्माण करणारे उद्योग उभे राहीले आहेत. शेतकरी व उद्योगांनामध्ये असलेल्या कामगार वर्ग या दोन्ही वर्गाला यामधून अर्थाजन होत आहे. वाढत्या इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या काही महिन्यातच बांबू चा उपयोग करून इथेनॉल निर्मीती प्रकल्प सुरू होत आहे. अशा बहुपयोगी बांबूची शेती कोकणातील शेतकर्‍यांनी आपली आर्थिक उन्नत्ती करण्यासाठी केली पाहीजे.

भविष्यात मानव जात वाचविण्यासाठी बांबू हे एक हत्यार ठरेल. जगभरात कार्बन चे प्रमाण दिवसागणिक वाढत असुन, कार्बन चे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी यापुढे बांबू लागवड ही महत्वाची ठरणार आहे. शेतकर्‍याला व कामगार वर्गाला अर्थाजन करून देणारा बांबू हा निसर्ग वाचविण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.भविष्यात बांबू लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे दिर्घ मुदतीचे कर्ज देण्याच्या आम्ही विचाराधीन आहोत. यापुढे हवामान बदलामूळे कोकणातील बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोकणातील आंबा, काजू ला बांबू हा एक पर्याय ठरणार आहेत. असे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT