कोकण

सावंतवाडी तालुक्‍यात विहिरींनी गाठला तळ

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - तालुक्‍यात पाणीटंचाईची झळ नसली तरी विहिरींनी तळ गाठला आहे. बऱ्याच गावात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील दीड महिना पाणी पुरेल का? याची ग्रामस्थांना चिंता जाणवत आहे. 

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. पाऊसही सरासरीपेक्षा या वर्षी काहीसा कमीच कोसळला. या सर्वाचा परिणाम सध्या जाणवत असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळेच आत्तापासून पाणी जपून वापरणे ग्रामस्थांच्या नशिबी आले आहे. 

तालुक्‍यातील न्हावेली, निरवडे, सोनुर्ली, वेत्ये, निगुडे, मळगाव तर सह्याद्री पट्ट्यातील काही भागात ही परिस्थिती आहे. सोनुर्ली पाक्‍याचीवाडी येथे तर विहिरींनी अक्षरक्षः तळ गाठल्याने ग्रामस्थांना आत्तापासून पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सध्यस्थितीत ग्रामपंचायतींच्या दोन नळ योजनेच्या विहिरी आहेत; मात्र त्यांनीही तळ गाठल्याने आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावात पाण्याचा अन्य कुठलाही स्त्रोत नसल्याने केवळ विहिरीच्या पाण्यावरच अंवलबून राहावे लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या मे मध्ये या ठिकाणी पाणीटंचाईची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय पाऊस वेळेवर न पडल्यास तीव्र टंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीतीही व्यक्‍त होत आहे. 

पंचायत समितीच्या माध्यमातून दरवर्षी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार कामांचे नियोजनही होते; मात्र मुळात पाण्याची पातळीच खोल गेल्याने पाणीटंचाई आराखडे राबवूनही काहीच फायदा होताना दिसत नाही. 

या व्यतिरिक्‍त बऱ्याच गावात एप्रिल, मे या अंतिम टप्प्यात सुरू करण्यात येणारी बांधकामे व सार्वजनिक विहिरीवर खासगी पंपाने करण्यात येणारा पाणी उपसा ही दोन्ही कारणे पाणीटंचाईला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतस्तरावर या संदर्भात विचार विनिमय होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी याबाबत तयारी दर्शविल्यास पाणीटंचाई आटोक्‍यात आणण्यात मदत होईल. शिवाय खासगी पंप लावण्याऱ्यावर कायदेशीर मार्गाने बंदी आणल्यासही पाणीटंचाई रोखली जाऊ शकते. 

शिरंशिगे-वीरवाडी येथे पाणीटंचाईची तक्रार पंचायत समितीत आली आहे. येथे उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्‍यात अन्य ठिकाणच्या तक्रारी नाहीत, तरीही काळजी घेतली जाईल. 
- गजानन भोसले,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT