Watershed Dams In Sangameshwar Taluka Unsafe
Watershed Dams In Sangameshwar Taluka Unsafe  
कोकण

संगमेश्वर तालुक्यातील `हे` पाणलोट बंधारे असुरक्षितत 

सकाळ वृत्तसेवा

आरवली ( रत्नागिरी) - संगमेश्वर तालुक्‍यातील माखजन, धामापूर, करजूवे परिसरात पाणलोट विभागामार्फत बांधलेले बंधारे सध्या असुरक्षिततेच्या कारणास्तव धोकादायक बनत आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी धामापूर भायजेवाडी गायमुखाजवळील जलबंधाऱ्यात दोन युवकांचा बुडून झालेल्या मृत्यूने बंधाऱ्यांची असुरक्षितता समोर आली आहे. सध्या पावसाळ्यात बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून या पाण्यात पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. अशावेळी त्या ठिकाणी बंधाऱ्यांची माहिती देणारा फलक किंवा सूचना देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते.

तिथे संरक्षक कठडा नसतो. त्यामुळे अतिउत्साही तरुण मुलं अथवा लहान मुलंही पोहण्याच्या आकर्षणाला बळी पडून बंधाऱ्यामध्ये उतरतात. अनेकदा या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये बुडतात. ग्रामपंचायत स्तरावर सूचना देणाऱ्या फलकांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याची गरज आहे. 

बंधाऱ्यामुळे पाणी अडवून स्थानिक विहिरींना पाणी वाढण्यासाठी नक्कीच मदत होत आहे. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा होत आहे; मात्र बंधाऱ्यांची असुरक्षितता सध्या मृत्यूचे कारण ठरल्यास दोष कुणाला द्यायचा, हा प्रश्न अनुत्तरित ठरत आहे. 

बंधारे पाच ते सात फूट खोल आहेत. त्यावरून वाहणारे पाणी धबधब्यासारखे पडते. बंधाऱ्याखाली खोल खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यात वाहत असलेले पावसाचे पाणी धोकादायक आहे. उन्हाळ्यात हे खड्डे बुजविण्याचा विचार आहे. 
- शांताराम भायजे, सरपंच, धामापूर.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT