Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : IPL दुबईत भारत-पाक सामना का नाही? PCBच्या माजी प्रमुखाने जय शहावर केले गंभीर आरोप

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर पीसीबीचे माजी प्रमुख नजम सेठी संतापले. आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत बैठकीच्या वेळी ते पीसीबीचे अध्यक्ष होते. आता त्याने आशियाई क्रिकेट परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत.

पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, “हे खूपच निराशाजनक आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले. पण पीसीबी चेअरमन होतो त्यावेळी मी ACC ला UAE मध्ये खेळण्याची विनंती केली होती, पण दुबईमध्ये खूप गरम आहे. पण जेव्हा सप्टेंबर 2022 मध्ये आशिया कप खेळला गेला तेव्हा आणि एप्रिल 2014 आणि सप्टेंबर 2020 मध्ये जेव्हा आयपीएल खेळला गेला तेव्हा येथील हवामान तितकेच गरम होते. खेळातील राजकारण अक्षम्य आहे.

आशिया कपचा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. कॅंडीच्या पल्लेकेले स्टेडियमवर हा सामना झाला. शनिवारी सामन्यापूर्वीच पावसाची शक्यता होती. भारताचा डाव संपल्यानंतरही पाऊस सुरूच राहिला आणि सामना रद्द करण्यात आला.

पाकिस्तान आशिया कपचे यजमान आहे आणि तेथेही काही सामने होणार आहेत. श्रीलंकेतही हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर होणार आहेत. इतर संघांनाही पाकिस्तानात खेळायचे आहे. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.

बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि एसीसी ही आशिया चषक स्पर्धा आयोजित करणारी आहे. अशा स्थितीत जय शहा यांच्यावर सेठींचे आरोप दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT