Team India Rohit Sharma sakal
क्रीडा

Rohit Sharma : वर्षाअखेर पर्यंत रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला मिळणार नारळ! असे होतील टीम इंडियामध्ये बदल

Kiran Mahanavar

Team India Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यानंतर बीसीसीआयकडून माहिती आली आहे की, रोहितला कर्णधारपद गमवावे लागू शकते. यासोबतच यामागचे कारणही समोर आले आहे.

2022 टी-20 विश्वचषक ही पहिली ICC ट्रॉफी होती ज्यात रोहित संघाचे नेतृत्व करत होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता टीम इंडिया 2023-2025 ची सायकल सुरू करण्याच्या तयारीत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धचा हा दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या दोन्ही कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार हे निश्चित आहे. पण यानंतर काय होणार? पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याची चर्चा सध्या तरी नाही. मात्र तो दोन वर्षांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्ण करू शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.

कारण 2025 मध्ये हे चक्र पूर्ण होईल. तोपर्यंत तो 38 वर्षांचा होईल. त्याचा फलंदाजीचा फॉर्म पाहून शिव सुंदर दास आणि इतर निवडकर्त्यांना या दोन कसोटींनंतर निर्णय घ्यावा लागेल असे दिसते. म्हणजे संदेश स्पष्ट आहे. जर टीम इंडिया 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली तर रोहित शर्मा त्या टीमचे नेतृत्व करणार नाही.

बीसीसीआयच्या या सूत्राने पुढे सांगितले की, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाला डिसेंबरपर्यंत एकही कसोटी सामना खेळायचा नाही. तोपर्यंत निर्णय घेण्यासाठी निवडकर्त्यांकडे बराच वेळ आहे.

रोहित शर्मासोबतच विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या फॉर्मवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 2021 ते 2023 या चक्रात या दोन मधल्या फळीतील फलंदाजांनीही चांगली कामगिरी केलेली नाही. रोहित कर्णधार झाल्यापासून विराटने 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यात 17 डावात 517 धावा आहेत. पुजाराने या कालावधीत आठ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 14 डावात 40.12 च्या सरासरीने 482 धावा केल्या.

2025 पर्यंत हे तिन्ही फलंदाज 35 च्या वर असतील याकडेही बीसीसीआयच्या निवडकर्त्यांचे लक्ष असेल. अशा स्थितीत त्यांच्यावर किती अवलंबून राहायचे हा एक मोठा प्रश्न आहे. आता हे पाहावे लागेल की बीसीसीआय काही मोठे निर्णय घेऊन बदल करते की पुन्हा एकदा 2021 ते 2023 च्या चुकीची पुनरावृत्ती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT