BCCI Run By BJP Government Claim Former PCB Chairman Ehsan Mani sakal
क्रीडा

'BCCI चा खरा कंट्रोल भाजपकडेच' PCB च्या माजी चेअरमनचा दावा

पीसीबीचे माजी अध्यक्ष म्हणतात बीसीसीआयवर भाजप सरकारचा कंट्रोल आहे.

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबाबत (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी मोठा दावा केला आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष म्हणतात बीसीसीआयवर भाजप सरकारचा कंट्रोल आहे. यामुळेच पाकिस्तान आणि भारत यांच्यात क्रिकेटबद्दल बोलता येत नाही. एहसान मनी यांनी काही दिवसानपूर्वीच पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.(BCCI Run By BJP Government Claim Former PCB Chairman Ehsan Mani)

क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत एहसान मनी म्हणतात की बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आहे. त्यांच्या बोर्डाचा सचिव कोण आहे, असा प्रश्न कधी कुणाला प्रश्न पडला आहे का ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ भाजपच्या एका मंत्र्याचा भाऊ आहे. त्याच्याकडे खरे बीसीसीआयचे नियंत्रण आहे. म्हणून मी सौरव गांगुलीशी तडजोड केली नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची मालिका २०१२ मध्ये खेळल्या गेली होती. त्यानंतर परत कधी पाकिस्तानचा संघ भारतच्या दौऱ्यावर आला. तेव्हापासून दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमध्ये चढ-उतार येत राहिले. जरी दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्ये अनेक वेळा सहभागी झाले आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा हेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटबद्दल सतत बोलत होते. अलीकडेच रमीझ राजाने आयसीसीला एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया टी-20 स्पर्धा आयोजित करावा, असे म्हटले होते. मात्र आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT