Virat Kohli And BCCI
Virat Kohli And BCCI Sakal
क्रीडा

SA vs IND : विराट फसलाय की; BCCI ठरवून त्याला खोटं पाडतंय?

सुशांत जाधव

Chetan Sharma On Virat Kohli Captaincy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराट कोहलीवर (Virat Kohli) आणखी एक वार केलाय. बीसीसीआय निवड समितीचे मुख्य अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या सूरात सुर मिसळत कोहलीला खोट ठरवणारे वक्तव्य केले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने 20 टी संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याला वनडेची कॅप्टन्सी सोडावी लागली. रोहित शर्माकडे वनडेचं नेतृत्व आले. या घडामोडींनंतर भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

मर्यादीत षटकांसाठी दोन कॅप्टन योग्य नाही. याच उद्देशातून रोहित शर्माकडे वनडेचं नेतृत्व दिले. टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नये. यावर पुन्हा एकदा विचार करावा, अशी चर्चा विराट कोहलीशी केली. पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्याच्याकडून वनडे संघाच नेतृत्व काढून घ्यावे लागले, अशा आशयाचे वक्तव्य गांगुलींनी केले होते. ही गोष्ट इथेच थांबली नाही. यावर विराट कोहलीने मला अशी कोणतीच विचारणा करण्यात आली नव्हती असे म्हटले होते. त्यामुळे कोण खरं बोलतंय आणि कोण खोट असा प्रश्न निर्माण झाला. यात आता आणखी एक भर पडली आहे.

बीसीसीआय निवड समितीचे मुख्य अध्यक्ष चेतन शर्मा यांनीही विराटच्या कॅप्टन्सीवर भाष्य केले आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली. यावेळी चेतन शर्मा यांनी कॅप्टन्सी बदलाच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, कोहलीला याबाबत माहिती दिली होती. टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर बोर्ड मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी वेगळा आणि कसोटीसाठी वेगळा कर्णधारटा विचार करत आहे. याचा टीम इंडियाला फायदा होईल. याबद्दल कोहलीशी चर्चा केली होती. चर्चा सकारात्मक झाल्यानंतरच निर्णय घेण्यात आला, असे चेतन शर्मा यांनी म्हटले आहे.

विराट कोहलीचा निर्णय आश्चर्यचकित करणारा

विराट कोहलीने अचानकपणे टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वर्ल्ड कप स्पर्धेला प्रभावित करेल त्यामुळे यावर जी काही चर्चा असेल ती वर्ल्ड कपनंतर करु, असे आमचे मत होते. असेही चेतन शर्मा म्हणाले आहेत. विराट कोहलीनं कॅप्टन्सी सोडल्यानंतर सर्व पाच सदस्य मर्यादित आणि कसोटी संघासाठी वेगळा कर्णधार असावा, या बाजूनं झुकले. विराटला वनडेतून काढून टाकणे हा बोर्डाचा निर्णय होता. पण त्याने टी-20 संघाची कॅप्टन्सी सोडल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असे चेतन शर्मांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT