india-v-pakistan 
क्रीडा

दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दहशतवाद व क्रिकेट एकत्र राहू शकत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारत व पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यांची मालिका होण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये येत्या चार जून रोजी एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी दुबईमध्ये भेटून दोन देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चाही करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर क्रीडामंत्र्यांनी बीसीसीआयला स्पष्ट इशारा दिला आहे.

आयसीसीच्या भविष्यकालीन वेळापत्रकानुसार या वर्षाच्या अखेरीस भारत व पाकिस्तानमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र दोन देशांमधील तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही मालिका रद्द होण्याची दाट शक्‍यता असून क्रीडामंत्र्यांनी दिलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

India's T20 WC 2026 Schedule : संघ जाहीर झाला आता भारताचं वेळापत्रक नोट करा! पहिला सामना अमेरिकेशी नंतर पाकिस्तानशी भिडणार...

Jalgaon Municipal Elections : भाजपची मास्टरस्ट्रोक 'खेळी'! मंगेश चव्हाण प्रभारी तर सुरेश भोळे निवडणूक प्रमुख; महाजनांकडे 'रिमोट कंट्रोल'

Latest Marathi News Live Update: गाडीत मराठी अनाउन्समेंट न झाल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक

Nrusinhawadi Tax : थकबाकीदारांना सवलत, प्रामाणिक करदात्यांना ठेंगा; शासन निर्णयावर नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT