Team India
Team India  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

शास्त्रींचा ड्रेसिंग रुममधील अखेरचा क्षण, व्हिडिओ व्हायरल

सुशांत जाधव

विराट कोहली (Virat Kohli) ने भारतीय टी20 संघाचे नेतृत्व सोडले आहे. टी 20 वर्ल्‍ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेतील 42 वा सामना कोहलीच्या कॅप्टन्सीमधील अखेरचा सामना ठरला. याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. कोहली-शास्त्री यांना निरोप देताना भारतीय संघाने नामिबियाला 9 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड स्पर्धेची सांगता विजयाने केली.

कोहली आणि शास्‍त्रींनी स्पर्धेपूर्वीच आपले पद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. या जोडीला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

कोहली आणि शास्‍त्री नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोहली ने शास्‍त्रींना खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने मुख्‍य प्रशिक्षक रवि शास्‍त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना जादू की झप्पी देत गुडबाय केले. याशिवाय शास्त्रींनी ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंचे आभार मानले. पाच वर्षांच्या कालावधीत टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रकारातील संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगत शास्त्रींनी संघातील खेळाडूंचा निरोप घेतला. ड्रेसिंग रुममधील निरोप समारंभातील त्यांचे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT