Team India  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

शास्त्रींचा ड्रेसिंग रुममधील अखेरचा क्षण, व्हिडिओ व्हायरल

शास्त्रींच ड्रेसिंग रुममधील भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सुशांत जाधव

विराट कोहली (Virat Kohli) ने भारतीय टी20 संघाचे नेतृत्व सोडले आहे. टी 20 वर्ल्‍ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेतील 42 वा सामना कोहलीच्या कॅप्टन्सीमधील अखेरचा सामना ठरला. याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. कोहली-शास्त्री यांना निरोप देताना भारतीय संघाने नामिबियाला 9 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड स्पर्धेची सांगता विजयाने केली.

कोहली आणि शास्‍त्रींनी स्पर्धेपूर्वीच आपले पद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. या जोडीला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

कोहली आणि शास्‍त्री नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोहली ने शास्‍त्रींना खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने मुख्‍य प्रशिक्षक रवि शास्‍त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना जादू की झप्पी देत गुडबाय केले. याशिवाय शास्त्रींनी ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंचे आभार मानले. पाच वर्षांच्या कालावधीत टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रकारातील संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगत शास्त्रींनी संघातील खेळाडूंचा निरोप घेतला. ड्रेसिंग रुममधील निरोप समारंभातील त्यांचे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT