Rohit Sharma IND vs AUS esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma : ऑस्ट्रेलियानं प्लॅन बदलला, मी ऑफ साईड.... रोहितनं सांगितलं मार्शची रणनिती कशी केली फेल

T20 World Cup 2024 : रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात वाऱ्याचा फॅक्टर कसा महत्वाचा ठरला हे सांगितलं.

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma IND vs AUS : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील सुपर 8 च्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचे सेमी फायनल गाठण्याचे स्वप्न जवळपास धुळीस मिळालं आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी केली. इतर फलंदाज चाचपडत असताना रोहितने एकट्याने टीम इंडियाच्या बॅटिंगची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, सामना झाल्यावर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाने सामन्यात कशी रणनिती बदलली त्यामुळं रोहितलाही आपल्या रणनितीत बदल करावा लागल्याचे सांगितले.

रोहित शर्मा म्हणाला, 'सामन्याच्या पहिल्या षटकापासूनच जोरदार वारा वाहत होता. त्यांनी त्यांचा प्लॅन चेंज करत हवेच्या विरूद्ध गोलंदाजी करण्यास सुरूवात केली. याची जाणीव झाल्यावर मी देखील माझी रणनिती बदलत ऑफ साईडला फटके मारण्यास सुरूवात केली.'

'सामन्यात वाऱ्याचा फॅक्टर महत्वाचा होता. तुम्हाला गोलंदाज स्मार्ट असतात हे समजून घ्यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला चौफेर फटकेबाजी करावी लागते. ज्यावेळी तुम्ही खुल्या मानसिकतेने खेळता आणि फक्त एकाच फटक्याचा विचार करत नाही त्यावेळी तुम्हाला मैदानाच्या सर्व कोपऱ्यात फटकेबाजी करून शकतात.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, '200 धावा या नक्कीच चांगली टोटल आहे. मात्र या प्रकारच्या मैदानावर खेळताना जिथं वाऱ्याचा मोठा परिणाम सामन्यावर होतो काहीही शक्य असतं. मात्र मला वाटतं आम्ही परिस्थितीचा चांगला फायदा उचलला. आम्ही त्या षटकांमध्ये तग धरला अन् ठराविक अंतराने विकेट्स देखील घेतल्या. त्यामुळे मी खूप खूश आहे.'

कुलदीप यादवबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, 'कुलदीपची क्षमता आम्हाला माहिती होती. मात्र त्याचा वापर ज्यावेळी गरज आहे त्याचवेळी करावा लागतो. न्यूयॉर्कमधील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांना पोषक होत्या. मात्र त्याला माहितं होतं की तो वर्ल्डकपमध्ये पुढच्या सामन्यात मोठी भुमिका बजावणार आहे.'

'खेळपट्टी तशी चांगली होती. फक्त तुम्हाला फटकेबाजी करताना स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. मी गेल्या अनेक वर्षापासून ते करण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याचं फळ मिळालं याची आनंद आहे. अर्धशतक आणि शतक महत्वाचं नाही.'

मी त्याच मानसिकतेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला मोठ्या धावा करायला आवडतं का तर नक्कीच मात्र याचवेळी तुम्ही गोलंदाजाला पुढचा फटका कुठं बसणार याचा विचार करायला भाग पाडणं देखील महत्वाचं आहे. मला वाटतं मी त्यात आज यशस्वी झालो.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा.... मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

Pune Viral : पुण्यात गणपती विसर्जनाला पैशांचा पाऊस; पाचशे, शंभरच्या नोटांचा खच, पैसे उचलायला भाविकांची झुंबड उडाली अन् पुढे जे झालं...

Latest Marathi News Updates : 'कोल्हापूर गॅझेटियर' संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद

Who is IAS Sakshi Sawhney? युवराज सिंगने कौतुक केलं, त्या साक्षी साहनी आहेत तरी कोण? व्यक्त केली भेटण्याची इच्छा

Pune Crime : पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT