Team-India
Team-India 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs NZ: भारत की न्यूझीलंड.. कोण जिंकणार? गावसकर म्हणतात...

विराज भागवत

माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले, "एक गोष्ट विसरू नका..." | Sunil Gavaskar on Ind vs Nz

India vs New Zealand, T20 World Cup 2021: भारताचा टी२० विश्वचषकातील आज दुसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून अपमानकारक पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडचादेखील हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. त्यांनाही पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले होते. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा आहे. अशा वेळी माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.

"न्यूझीलंडचा संघ हा कायम संतुलित संघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या संघामध्ये संघर्ष करण्याची वृत्ती आहे. न्यूझीलंडचे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. त्यामुळे न्यूझीलंड विरोधात खेळताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. न्यूझीलंडच्या संघाला पटकन मात देता येत नाही. पण असं असलं तरी भारतीय संघाने न्यूझीलंडला ५-० ने पराभूत केले होते हे विसरू नका. त्या पाच सामन्यापैकी २ सामने सुपर ओव्हरपर्यंतही गेले होते. त्यामुळे या मालिकेची आठवण ठेवून टीम इंडियाने मैदानात उतरावे", असं गावसकर म्हणाले.

Team India

भारत-न्यूझीलंड आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण १६ टी२० सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी भारताचा ८ सामन्यात तर न्यूझीलंडचा ८ सामन्यात विजय झाला आहे. पण टी२० विश्वचषकात आतापर्यंत हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले असून दोन्ही वेळा भारतीय संघ पराभूत झाला आहे. इतकंच नव्हे तर २००७ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता असलेला भारतीय संघ त्या स्पर्धेत केवळ एकाच सामन्यात पराभूत झाला होता. त्यावेळीदेखील भारताला केवळ न्यूझीलंडनेच पराभूत केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT