Hardik Pandya SAKAL
Cricket

Hardik Pandya : वादळानंतर तो सावरला! नताशासोबत घटस्फोटानंतर 2 दिवसांनी हार्दिकने केला नवीन बिजनेस लॉन्च

हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष आतापर्यंत चढ-उतारांनी भरलेले आहे.

Kiran Mahanavar

हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष आतापर्यंत चढ-उतारांनी भरलेले आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा राग असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील दु:ख असो, हे वर्ष हार्दिकसाठी फारसे चांगले गेले नाही. त्यात त्याचा पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोट झाला. असे असूनही हार्दिक स्वतःला सावरत पुढे जात आहे आणि नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

18 जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी असे मानले जात होते की, हार्दिकलाच ही जबाबदारी मिळेल. कारण तो टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा उपकर्णधार होता आणि गेल्या वर्षी कर्णधार होता. यानंतर काही वेळातच हार्दिकने नताशासोबतचे ४ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याची घोषणाही केली.

अशा कठीण काळातही हार्दिक खंबीर राहिला आहे आणि वादळानंतर तो सावरला. फक्त दोन दिवसांनंतर शनिवारी 20 जुलै रोजी हार्दिक पांड्या मुंबईतील एका कार्यक्रमात दिसला, जिथे त्याच्या चेहऱ्यावर हास्य देखील दिसले. ही संधी त्याच्यासाठी सुद्धा खास होती कारण सर्व परिस्थितीतुन सावरला त्याने आपला नवीन बिजनेस सुरू केला.

आपल्या फिटनेसबाबत प्रश्नांचा सामना करणाऱ्या हार्दिकने फॅन कोडच्या सहकार्याने आपला फिटनेस कपड्यांचा ब्रँड सुरू केला. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक दमदार व्हिडिओही शेअर केला आहे.

हार्दिक हा मानसिकदृष्ट्या खूपच तंदुरुस्त आहे, त्यामुळे आयपीएलदरम्यान इतक्या टीका होऊनही त्याने वर्ल्ड कपमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वैयक्तिक आयुष्यात एवढा मोठा बदल होऊनही तो लोकांसमोर येऊन आपले आयुष्य पुढे नेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT