BAN vs IND women T20  sakal
Cricket

BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये उद्या अखेरचा टी-२० सामना होणार आहे. याप्रसंगी भारतीय महिला संघ या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, यात शंका नाही. बांगलादेशचा संघ घरच्या मैदानावर प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करील.

सकाळ वृत्तसेवा

सिलहट (बांगलादेश) : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये उद्या अखेरचा टी-२० सामना होणार आहे. याप्रसंगी भारतीय महिला संघ या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, यात शंका नाही. बांगलादेशचा संघ घरच्या मैदानावर प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करील.

भारतीय संघाने या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे; पण पाऊस व वातावरणाचा फटका बसलेल्या या मालिकेत भारतीय फलंदाजांकडून प्रतिमेला साजेशी कामगिरी झालेली नाही. शेफाली वर्मा हिने एकमेव अर्धशतक झळकावले आहे.

आता उद्या होत असलेल्या अखेरच्या लढतीत हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना या दोन अनुभवी खेळाडूंकडून चमकदार फलंदाजीची अपेक्षा आहे. बांगलादेशातच या वर्षअखेरीस टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

बांगलादेशने भारतीय संघावर २०२३मध्ये अखेरचा टी-२० विजय मिळवला होता. मीरपूरमध्ये त्यांनी हा विजय मिळवला होता. आता बांगलादेशचा संघ भारतीय संघावर एका लढतीत तरी विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT