MS Dhoni Batting at No 7 
Cricket

वाद धोनीच्या फलंदाजी क्रमाचा 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिह धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या एका निर्णयावरून फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर खापर फोडले जात असतानाच शुक्रवारी धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता,असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला. 

स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पावसामुळे लांबला होता. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 8 बाद 239 असे रोखले. पण, राखीव दिवशी 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचे आघाडीचे चार फलंदाज 10 षटकांत 24 धावांत बाद झाल्यावर रवींद्र जडेजा (77) आणि धोनी (50) यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली होती. पण, त्यांची ही भागीदारी होण्यास उशीर झाला. भारताला 18 धावांनी पराभवाचा समाना करावा लागला. त्या वेळी धोनीच्या आधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याला पाठविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

बांगर म्हणाले,""त्या वेळी सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या. समालोचकही माझ्या नावाचा उल्लेख करू लागले होते. मात्र, खात्री बाळगा हा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता. फलंदाजीसाठी 5, 6 आणि सातव्या क्रमांकासाठी आम्ही लवचिकता ठेवली होती. कारण, आम्ही साधारण 30 ते 40व्या षटकांत यांना फलंदाजी येईल असे मानले होते.'' 

आधीच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हाणामारीच्या षटकांत धोनी खेळायला आल्यास फायदा होईल असे वाटल्यानेच उपांत्य फेरीत त्याला सहाव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय आम्ही बैठकीत घेतला होता. बांगर म्हणाले,""धोनीने त्याच्या नेहमीच्या पाचव्या स्थानावर न खेळता खालच्या क्रमांकावर खेळल्यास अखेरच्या षटकांत धावांचा वेग वाढवण्यास मदत होईल, असे कोहलीनेच सांगितले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत त्याला सहाव्या ख्रमांकावर पाठविण्यात आले.'' 

धोनीचा अनुभव आणि त्याची मॅच अखेरच्या षटकापर्यंत ताणून संपविण्याची आगळी पद्धत लक्षात घेता त्याला सातव्या क्रमांकावर खेळविण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने एकत्रित घेतला होता. त्याच्याशी केवळ माझ्या एकट्याचा संबंध नव्हता, याचा बांगर यांनी पुनरुच्चार केला. 

धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले, तर त्याच्या अनुभवाचा आणि आक्रमक खेळाचा आपल्याला फायदाच होईल,असा विचार होता. त्या पद्धतीने त्याचा विचार केला नसता,तर ती चूक ठरली असती आणि हे खेळाडूच नाही, तर संपूर्ण संघ व्यवस्थापन हे जाणून होते. 
-संजय बांगर, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT