Virat Kohli - Sachin Tendulkar | World Cup 2011 Sakal
Cricket

World Cup 2011 Final: सचिनने आऊट झाल्यानंतर मैदानात जाणाऱ्या 22 वर्षांच्या विराटला नक्की काय सांगितलं होतं?

Virat Kohli - Sachin Tendulkar: वर्ल्डकप 2011 च्या अंतिम सामन्यात सचिनने आऊट झाल्यानंतर मैदानात जाणाऱ्या विराटला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती.

Pranali Kodre

World Cup 2011: भारतीय क्रिकेटसाठी 2 एप्रिल ही तारीख खूप खास आहे. कारण याचदिवशी 13 वर्षांपूर्वी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वर्ल्डकप जिंकला होता.

दरम्यान वर्ल्डकप 2011 मधील अंतिम सामना म्हटलं की अनेकांना एमएस धोनीचा विजयी षटकार, गौतम गंभीरची 97 धावांची खेळी, युवराज सिंगचे आनंदाश्रू अन् सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन वानखेडे स्टेडियमची मारलेली फेरी आठवते. पण याच सामन्यात 22 वर्षांच्या विराट कोहलीनेही महत्त्वाचे योगदान दिले होते.

या सामन्यात भारतासमोर कुमार संगकाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंका संघाने 275 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने विंरेंद्र सेहवागची विकेट डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर गमावली होती. त्यानंतर सातव्या षटकात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही 18 धावांवर बाद झाला. त्यावेळी विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

दरम्यान, विराटला सचिनने पॅव्हेलियनमध्ये परतताना एक मोलाचा सल्ला दिली होता, याबद्दल स्वत: सचिनने खुलासा केला होता. सचिनला एका चाहत्याने विराटला मैदानात येत असताना सचिनने पॅव्हेलियनमध्ये माघारी परतताना काय सांगितले होते, याबद्दल विचारले होते. त्यावर सचिनने ट्वीट केले होते की 'अजूनही चेंडू स्विंग होत आहे.'

महत्त्वाचे म्हणजे विराटनेही नंतर मैदानात येत गौतम गंभीरला चांगली साथ दिली होती. त्यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी झाली होती. या भागीदारीमुळे भारतच्या डावाला स्थिरता मिळाली होती. विराट 35 धावा करून बाद झाला होता.

नंतर गंभीरने एमएस धोनीबरोबर 109 धावांची भागीदारी केली आणि भारताला विजयाच्या दिशेने नेले. गंभीरने 97 धावांची खेळी केली, तर धोनीने षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली.

यासह भारताने 1983 नंतर दुसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. अंतिम सामन्यात धोनीने सामनावीर पुरस्कार जिंकला होता, तर संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने मैदान गाजवलेल्या युवराज सिंगला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.

या स्पर्धेत विराटने 9 सामन्यात 282 धावा केल्या होत्या. त्याने बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 100 धावांनी नाबाद खेळीही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT