Virat Kohli - Sachin Tendulkar | World Cup 2011
Virat Kohli - Sachin Tendulkar | World Cup 2011 Sakal
क्रिकेट

World Cup 2011 Final: सचिनने आऊट झाल्यानंतर मैदानात जाणाऱ्या 22 वर्षांच्या विराटला नक्की काय सांगितलं होतं?

प्रणाली कोद्रे

World Cup 2011: भारतीय क्रिकेटसाठी 2 एप्रिल ही तारीख खूप खास आहे. कारण याचदिवशी 13 वर्षांपूर्वी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वर्ल्डकप जिंकला होता.

दरम्यान वर्ल्डकप 2011 मधील अंतिम सामना म्हटलं की अनेकांना एमएस धोनीचा विजयी षटकार, गौतम गंभीरची 97 धावांची खेळी, युवराज सिंगचे आनंदाश्रू अन् सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन वानखेडे स्टेडियमची मारलेली फेरी आठवते. पण याच सामन्यात 22 वर्षांच्या विराट कोहलीनेही महत्त्वाचे योगदान दिले होते.

या सामन्यात भारतासमोर कुमार संगकाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंका संघाने 275 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने विंरेंद्र सेहवागची विकेट डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर गमावली होती. त्यानंतर सातव्या षटकात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही 18 धावांवर बाद झाला. त्यावेळी विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

दरम्यान, विराटला सचिनने पॅव्हेलियनमध्ये परतताना एक मोलाचा सल्ला दिली होता, याबद्दल स्वत: सचिनने खुलासा केला होता. सचिनला एका चाहत्याने विराटला मैदानात येत असताना सचिनने पॅव्हेलियनमध्ये माघारी परतताना काय सांगितले होते, याबद्दल विचारले होते. त्यावर सचिनने ट्वीट केले होते की 'अजूनही चेंडू स्विंग होत आहे.'

महत्त्वाचे म्हणजे विराटनेही नंतर मैदानात येत गौतम गंभीरला चांगली साथ दिली होती. त्यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी झाली होती. या भागीदारीमुळे भारतच्या डावाला स्थिरता मिळाली होती. विराट 35 धावा करून बाद झाला होता.

नंतर गंभीरने एमएस धोनीबरोबर 109 धावांची भागीदारी केली आणि भारताला विजयाच्या दिशेने नेले. गंभीरने 97 धावांची खेळी केली, तर धोनीने षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली.

यासह भारताने 1983 नंतर दुसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. अंतिम सामन्यात धोनीने सामनावीर पुरस्कार जिंकला होता, तर संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने मैदान गाजवलेल्या युवराज सिंगला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.

या स्पर्धेत विराटने 9 सामन्यात 282 धावा केल्या होत्या. त्याने बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 100 धावांनी नाबाद खेळीही केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT