hardik pandya esakal
क्रीडा

पहाटे पाच वाजता उठायचो अन्... पांड्याने सांगितली मनातली गोष्ट

टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पांड्याने मोठे वक्तव्य केले आहे.

धनश्री ओतारी

आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मध्यंतरी तो अनफीट असल्याने खराब फॉर्मशी झगडत होता. दरम्यान, त्याने फिट होत पुनरागमन केले आहे. याचा प्रत्यय आयपीएल १५ मध्ये आला आहे. अशातच त्याने त्याच्या यशामागच्या रहस्याचा खुलासा केला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

भारतीय संघात परतण्यापूर्वी, हार्दिक पांड्याचा दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध होता, ज्यामध्ये तो रात्री 9.30 वाजता झोपायचा आणि पहाटे पाच वाजता उठायचा, ज्यामुळे त्याला स्वतःविरुद्ध आणि इतर गोष्टींविरुद्ध युद्ध जिंकण्यात मदत झाली. पांड्याने चार महिने या 'टाइम टेबल'चे काटेकोरपणे पालन केले, त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आपण फॉर्ममध्ये परतले असल्याचे दाखवून दिले. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पदार्पणातच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) चे विजेतेपद पटकावले.

बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पांड्याने त्याच्या यशामागच्या रहस्याचा खुलासा केला आहे. 'मी आनंदी होतो. हे माझ्या आणि इतर बर्‍याच गोष्टींविरूद्ध लढाई जिंकण्याबद्दल होते. आयपीएल जिंकणे आणि प्लेऑफसाठी पात्र होणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण बरेच लोक माझ्यावर शंका घेत होते. माझ्या पुनरागमनापूर्वी अनेक गोष्टी बोलल्या गेल्या होत्या.'

पहाटे पाच वाजता उठायचो अन्...

29 वर्षीय पांड्या म्हणाला, जेव्हा मी टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाबाहेर होतो, तेव्हा सलग चार महिने पहाटे पाच वाजता उठायचो आणि रात्री 9.30 पर्यंत झोपत होतो. मला कुणाला उत्तर कधीच द्यायचे नव्हते. मी अनुसरण केलेल्या प्रक्रियेचा मला अभिमान आहे. मी बाहेर असताना त्या सहा महिन्यांत मी कोणत्या टप्प्यातून गेलो हे कोणालाच माहीत नाही. मी पहाटे पाच वाजता उठायचे जेणेकरून मला ट्रेन करता येईल. चार महिने मी रात्री साडेनऊपर्यंत झोपायचो, या दरम्यान मी खूप काही त्याग केल आहे. असे सांगत तो म्हणाला, 'ही एक लढाई होती, जी मी आयपीएलपूर्वी लढली होती. मी माझ्या आयुष्यात नेहमीच कठोर परिश्रम केले आहेत आणि त्यामुळे मला हवे ते परिणाम मिळाले आहेत. अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

तसेच, 'टूर्नामेंटमध्ये पोहोचेपर्यंत तुम्ही कोणतीही मालिका किंवा सामना खेळता, ते महत्त्वाचे असते. त्यामुळे माझ्यासाठी विश्वचषक हे लक्ष्य आहे, लयीत येण्यासाठी ते योग्य व्यासपीठ आहे. नेहमी लयीत राहणे खूप महत्वाचे आहे. असही पांड्या म्हणाला. 'येथे माझी भूमिका बदलेल, मी कर्णधार नाही, मी फलंदाजी क्रमाने उंच खेळणार नाही. ज्या हार्दिकसाठी मी ओळखतो त्याच हार्दिकची ही पुनरागमन असेल. अशी आव्हानात्मक भूमिकाही त्याने यावेळी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT