virat
virat 
क्रीडा

World Cup 2019 : आजही पाऊस आला तर भारत...

वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल पावसामुळे उद्या बुधवारवर ढकलला गेला आहे. आजही पावसामुळे खेळ वाया गेला तर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.

सामना मंगळवारी पावसामुळे थांबविण्यात आला तेव्हा न्यूझीलंडने 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या होत्या. पावसाने विश्रांती घेतल्यावर सामना सुरू होण्याची लक्षणे होती. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने अखेरीस राखीव दिवसाची मदत घेण्यात आली. आता राखीव दिवशी मंगळवारी सामना थांबला त्या स्थितीतून पुढे खेळविला जाईल. मात्र, पावसाचा धोका उद्या देखील आहे. सामना पूर्ण 50 षटकांचा होण्यासाठी किमान साडेचार तासांचा पावसाचा ब्रेक आवश्‍यक आहे, तर ट्‌वेंटी-20 साठी दोन तास. या परिस्थितीत मॅंचेस्टरचे हवामान पाहिल्यास लढत सुरू होण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण असेल. पण, तासाभराने (भारतीय वेळेनुसार 4 वाजता) पाऊस होईल, असा ऍक्‍युवेदरचा अंदाज आहे. 

त्यानंतर किमान चार तास ढगाळ हवा असेल आणि पुन्हा एक तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता उद्या देखील सामना झाला नाही, तर साखळीतील सर्वाधिक गुणांच्या जोरावर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT