ind vs aus test virat kohli-nightmarish-home-runs-no-test-century-for-last-3-years-flop-show-continue-against-australia  
क्रीडा

Ind vs Aus : विराट कोहली टीम इंडियासाठी ओझं! 3 वर्षे कसोटीत शतक तर नाही, आकडेवारी ही खराब

कोहलीची वाईट अवस्था आता संपली आहे असे वाटले पण...

Kiran Mahanavar

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून बराच काळ लोटला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट फ्लॉप ठरला. गेल्या तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात कसोटी मालिकेत विराट शतकांचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा होती.

मात्र सध्याच्या मालिकेतील पाच डावांत त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. विराटच्या बॅटने शेवटचे कसोटी अर्धशतक गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आले होते. कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा कसोटी सामना होता.

सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत विराटने 5 डावात 111 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 22.20 इतकी आहे. गेल्या वर्षी जेव्हा त्याने 1021 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले, तेव्हा कोहली पुन्हा जुन्या लयीत परतला आहे. त्यानंतर त्याने आशिया कप टी-20 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शानदार 112 धावांची खेळी केली.

आंतरराष्ट्रीय टी-20 मधील कोहलीचे हे पहिले शतक होते. यानंतर त्याने गेल्या वर्षी डिसेंबर आणि या वर्षी जानेवारीमध्ये 3 एकदिवसीय शतके झळकावून आपले आंतरराष्ट्रीय शतक 74 वर नेले. कोहलीची वाईट अवस्था आता संपली आहे असे वाटले पण तो अजूनही कसोटीत संघर्ष करत आहे.

सध्याच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 12 धावा केल्या, तर दिल्ली कसोटीत त्याच्या बॅटने 44 आणि 20 धावा केल्या. इंदूर कसोटीत त्याला केवळ 13 आणि 22 धावा करता आल्या. विराट कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत असल्याची साक्ष आकडेवारी देत ​​आहे.

विराट कोहलीच्या फलंदाजीत 2019 सालानंतर घसरण स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर बांगलादेश विरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्यात 136 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याला 24 कसोटी सामन्यांच्या 41 डावांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.

विराटने 2019 पासून 23 कसोटी सामने खेळला आहेत, ज्यात त्याची सरासरी 25.7 आहे. यादरम्यान त्याने 1028 धावा केल्या आहेत. 2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या विराटने तेव्हापासून 2019 पर्यंत 86 कसोटी सामन्यांमध्ये 54 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT