ind vs aus test virat kohli-nightmarish-home-runs-no-test-century-for-last-3-years-flop-show-continue-against-australia
ind vs aus test virat kohli-nightmarish-home-runs-no-test-century-for-last-3-years-flop-show-continue-against-australia  
क्रीडा

Ind vs Aus : विराट कोहली टीम इंडियासाठी ओझं! 3 वर्षे कसोटीत शतक तर नाही, आकडेवारी ही खराब

Kiran Mahanavar

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून बराच काळ लोटला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट फ्लॉप ठरला. गेल्या तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात कसोटी मालिकेत विराट शतकांचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा होती.

मात्र सध्याच्या मालिकेतील पाच डावांत त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. विराटच्या बॅटने शेवटचे कसोटी अर्धशतक गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आले होते. कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा कसोटी सामना होता.

सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत विराटने 5 डावात 111 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 22.20 इतकी आहे. गेल्या वर्षी जेव्हा त्याने 1021 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले, तेव्हा कोहली पुन्हा जुन्या लयीत परतला आहे. त्यानंतर त्याने आशिया कप टी-20 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शानदार 112 धावांची खेळी केली.

आंतरराष्ट्रीय टी-20 मधील कोहलीचे हे पहिले शतक होते. यानंतर त्याने गेल्या वर्षी डिसेंबर आणि या वर्षी जानेवारीमध्ये 3 एकदिवसीय शतके झळकावून आपले आंतरराष्ट्रीय शतक 74 वर नेले. कोहलीची वाईट अवस्था आता संपली आहे असे वाटले पण तो अजूनही कसोटीत संघर्ष करत आहे.

सध्याच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 12 धावा केल्या, तर दिल्ली कसोटीत त्याच्या बॅटने 44 आणि 20 धावा केल्या. इंदूर कसोटीत त्याला केवळ 13 आणि 22 धावा करता आल्या. विराट कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत असल्याची साक्ष आकडेवारी देत ​​आहे.

विराट कोहलीच्या फलंदाजीत 2019 सालानंतर घसरण स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर बांगलादेश विरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्यात 136 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याला 24 कसोटी सामन्यांच्या 41 डावांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.

विराटने 2019 पासून 23 कसोटी सामने खेळला आहेत, ज्यात त्याची सरासरी 25.7 आहे. यादरम्यान त्याने 1028 धावा केल्या आहेत. 2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या विराटने तेव्हापासून 2019 पर्यंत 86 कसोटी सामन्यांमध्ये 54 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Indian CEO In USA: 'अमेरिकेत कंपनीचा CEO होण्यासाठी भारतीय असणं गरजेचं', असं का बोलले अमेरिकेचे राजदूत?

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT